फाशीची शिक्षा किरकोळ, त्याला जिवंत जाळा Top 10 News : नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना, या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आरोपीचा मुलगा म्हणाला की, मला बाप म्हणून त्याला स्वीकारण्याची लाज वाटते. माझी एकच चूक आहे की मी त्याच्या पोटी जन्मलो. सरकारने त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. त्याला ठेचून मारायला हवं. त्याने केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही. त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे, पीडित मुलगी माझ्या भाची सारखी होती, असंही आरोपीच्या मुलाने सांगितले. आरोपीला जिवंत जाळा…उभं जाळा…मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला पण येऊ नका…फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे, त्याला जिवंत जाळलं पाहिजे, असं आरोपीच्या पत्नी म्हणाल्या. लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० जमा होणार फेब्रुवारी २०२६ मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात शेवटचा १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर अद्याप पुढील हप्ता मिळालेला नाही. काही महिलांच्या खात्यात जानेवारीपासून पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे आपला अर्ज बाद झाला आहे का? अशी भीती त्यांना वाटत आहे. अशा महिलांना ५००० ते ६५०० रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याचीही चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासूनचे थकीत हप्ते जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. राज्यातील पात्र महिलांना मार्च महिन्यापासूनचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. ३० एप्रिल रोजी ई-केवायसीची मुदत संपल्यानंतर आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलंय जातंय. महिलेला पर्यायी व्यवस्था देण्यात येईल – बच्चू कडू छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओसोशल मीडियातून व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एका दिव्यांग महिलेचे मडक्यांचेछोटेसे दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाई जमीनदोस्त झालेल्या आपल्या दुकानातील मडक्याचे तुकडे ही महिला असहायपणे एकत्र करत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळालं.दरम्यान या महिलेच्या मदतीसाठी नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्याला झाल्प्याचं सांगण्यात येतंय. याविषयी त्यांनी ही बातमी कळताच मी लगेच कार्यकर्त्यांना तिथं पाठवलं. अर्चनाताईंची भेट घेत ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यालाही फोनवरून सुनावण्यात आले, अशी माहिती बच्चू कडू यांनी ट्विट करुन दिली. दिव्यांग व्यक्तीच्या उपजीविकेवर घाला घालणं हे अजिबात सहन केलं जाणार नाही. ताईंच्या व्यवसायासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहेत, अशी देखील माहिती त्यांनी दिली. आवाज येऊ नये म्हणून नराधमाने तिच्या तोंडात पायमोजा कोंबला Top 10 News : नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाने आता एक भयंकर वळण घेतले आहे. ससून रुग्णालयाने दिलेल्या प्राथमिक शवविच्छेदनअहवालातून आरोपीच्या क्रूरतेची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अत्याचार करताना त्या निष्पाप मुलीचा आवाज बाहेर येऊ नये, यासाठी नराधमाने तिच्या तोंडात पायमोजा कोंबला होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. शवविच्छेदन दरम्यान मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. विशेषतः तिच्या छातीवर गंभीर वळ उमटलेले असून, आरोपीने अत्यंत निर्दयीपणे तिला मारहाण केल्याचे निदर्शनास आले आहे. गुदमरून मृत्यू झाला की आणखी काही, याचे नेमके कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने राखून ठेवण्यात आले असून ते न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्रावर पुन्हा संकट, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट घोंघावत आहे. उन्हाचा पारा चढलेला असतानाच आता पुन्हा एकदा वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आज उन्हाळी हवामान कायम राहणार असून कोकणात दमट हवा, विदर्भात तापमान जास्त आणि वादळी पाऊस, तर उर्वरित महाराष्ट्रात काही दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. मात्र, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानाचा पारा 1-2 अंशांनी घसरला आहे. 6 मेपासून पुन्हा उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट असेल.ध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या तापमानात काहीशी घट झाली आहे. आज कमाल तापमान 36-38 अंशांवर राहील. तर किमान तापमान 23 अंश नोंदवले जाईल. 7 मेपासून हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता असून अवकाळी पाऊस सक्रीय होईल.मराठवाड्यात आज कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. सत्तेसोबत आमदारकीही गेली एकीकडे भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारत तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केला. त्याचवेळी दुसरीकडे ममता बॅनर्जींनाही मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांची सत्तेसोबत आमदारकीही गेलीय. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला आहे. भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,111 मतांनी पराभव केला. ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शुभेंदु अधिकारी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला. ममता बॅनर्जींचा पराभव होणं गरजेचं होतं. हा विजय बंगालच्या एकजुटीचा असल्याची प्रतिक्रिया शुभेंदु अधिकारी यांनी दिली. रिक्षावाल्याने या दिग्गजांना चारली धूळ तमिळनाडूच्या रॉयपुरम मतदारसंघात एका सामान्य रिक्षा चालकाचा विजय मिळाला आहे. साऊथचा सुपरस्टार विजय थलपती याच्या TVK पक्षाचे उमेदवार विजय धामु यांनी जागेवर ऐतिहासिक विजय मिळवला असून सध्या संपूर्ण देशात त्यांच्या नावाची चर्चा आहे. विजय धामू यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये. तर ते आपली रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे एक सामान्य नागरिक आहेत. मात्र जेव्हा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. धामू यांनी तमिळनाडूच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांना धूळ चारली असून जायंट किलर ठरले आहे. विजय धामू यांनी AIADMK चे नेते डी.जयकुमार आणि माजी मंत्री रहमान खान यांचे चिरंजीव यांचा दारुण पराभव केला. इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेतून काही मार्ग निघत नसल्याचं चित्र आहे. अमेरिकेनं इराणनं आमच्यासोबत डील करावी अशी भूमिका घेतली आहे. इराण जर डील करणार नसेल त्यांच्यावर लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. आता इराण देखील होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मुद्यावरुन आक्रमक झालाय. इराणनं आता होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आरपारची भूमिका घेतल्याचं बोललं जातंय. इराणची वृत्तसंस्था फार्सनुसार इराणच्या नौसेनेनं होर्मुझजवळ एका अमेरिकन युद्धनौकेवर दोन क्षेपणास्त्रांचा मारा करत हल्ला केला आहे. इराणच्या या भूमिकेमुळं आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्सचा विजय आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अखेर मुंबई इंडियन्सनं अखेर वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी दमदार भागीदारी करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. यानंतर नमन धीर यानं मुंबईला विजयाजवळ पोहोचवलं. लखनौ सुपर जायंटसनं प्रथम फलंदाजी करताना 228 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी लखनौच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी मुंबईचा विजय सोपाक केला. दरम्यान, रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील लखनौ सुपर जायंटसचा यंदाच्या आयपीएलमधील सातवा पराभव झाला आहे. मुंबईच्या विजयामुळं गुणतालिकेत काही बदल झालेला नाही. ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई Top 10 News : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याच विकेंडमध्ये अभूतपूर्व यश संपादन करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर ठरण्याचा मान पटकावलाय. महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई नोंदवली. त्यानंतर शनिवारी मजबूत पकड कायम ठेवत, रविवारी चित्रपटानं आणखी मोठी झेप घेत विकेंडमधील सर्वोच्च कमाई केली. रविवारी सिनेमानं 13.10 कोटी नेट कमाई करत शनिवारीच्या तुलनेत 13.5% वाढ नोंदवली. यासह, तीन दिवसांची एकूण कमाई भव्य 37.00 कोटी नेट झाली आहे. म्हणजेच, एकूण तीन दिवसांत रितेश देशमुख यानं एकूण 33.90 कोटींची कमाई केलीय. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या एकूण कमाईत सर्वात मोठा वाटा हा मराठी आवृत्तीचा आहे. ‘राजा शिवाजी’ यावर्षीचा मराठीतील सर्वात कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरलाय.