राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची Top 10 News : मराठी भाषेबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यम आणि मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययनाची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई देखील केले जाणार आहे.नियम मोडणाऱ्या शाळांवर १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. तर वारंवार आदेश धुडकावणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याची तरतूद नवीन शासन निर्णयात करण्यात आली आहे.अनेक खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अद्यापही मराठी विषय शिकविला जात नाही, ही बाब निदर्शनास आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू – मुख्यमंत्री नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालंय.हे विधेयक पारित होण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज होती. मात्र ते मिळवण्यात सरकारला अपयश आलंय. दरम्यान , यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत . त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिलीय.ही पूर्णतः लाजिरवाणी बाब असून महिला सशक्तीकरण ही आमच्यासाठी बांधिलकी आहे, त्यामुळे आम्ही उद्यापासून रस्त्यावर उतरू, असे म्हणत फडणवीस यांनी महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील, आज लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ नामंजूर होणे हे दुर्दैवी आहे, अशी भूमिका ट्विट करुन मांडली. प्रियांका चतुर्वेदींनी पक्षाविरोधात पहिलं पाऊल टाकलं . महिला आरक्षणाशी संबंधित संविधानातील 131वी घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारला संसदेत मंजूर करुन घेता आले नाही. हे विधेयक पारित होण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज होती. मात्र, विधेयकायच्या बाजूने 298 आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. त्यामुळे घटनादुरुस्तीसह महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. ही भाजपप्रणित रालोआ आघाडीसाठी नामुष्की मानली जात आहे. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत एका नव्या वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाच्या माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर पक्षाच्या विरोधात जाऊन या विधेयकाचे समर्थन करणारी भूमिका घेतली. त्यांनी हे विधेयक मंजूर न झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. ठाकरे गटाच्या खासदारांनी काल या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे प्रियांका चतुर्वेदींनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात पुणे विमानतळासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे विमानतळाची धावपट्टी पुढील काही तासांसाठी बंद करण्यात आली आहे. या किरकोळ अपघातात विमान कर्मचारी सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. मात्र, धावपट्टी मोकळी करून सामान्य विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. सध्या दुरुस्तीचे प्रयत्न वेगाने सुरू असून विमानसेवा पुन्हा सुरू होण्यास अंदाजे पाच तास लागतील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने काल रात्री उशिरा सांगितले की, त्यांच्या एका विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे विमानतळावरील धावपट्टी तात्पुरती अनुपलब्ध आहे. धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले. प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री Top 10 News : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण दरेकरांच्या नावासमोरचा कँबिनेट दर्जा जाऊन ते पुढचे सहकार मंत्री व्हावेत, असं वक्तव्य चंद्रकातं पाटील यांनी केलं आहे. त्यामुळं अर्थ खात्यापाठोपाठ आता सहकार खात्यावरही भाजपचा डोळा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रवीण दरेकरांच्या नावासमोरचा कँबिनेट दर्जा जाऊन ते पुढचे सहकार मंत्री व्हावेत, अशा शुभेच्छा पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानंतर भाषणात असं बोलावं लागतं असं पाटील म्हणाले. प्रवीण दरेकर यांच्या नावामागील कँबिनेट दर्जा हा शब्द लवकरात लवकर जावा अशी प्रार्थना करु आणि मंत्रीपद यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो ते कदाचित सहकार पद त्याच्याकडे येई असे पाटील म्हणाले.दरम्यान , त्यांनी केलेल्या या विधानाने मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महिला आरक्षण, डिलिमिटेशन विधेयक नामंजूर नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालंय. तब्बल 12 वर्षांनी मोदी सरकारला लोकसभेत पहिल्यांदा मोठा धक्का बसलाय. एवढंच नाही तर महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्र शासित प्रदेश सुधारणा विधेयक माघार घेण्याची नामुष्की मोदी सरकारवर ओढवलीय.त्यानंतर लोकसभेत 528 सदस्यांनी मतदान केलं. त्यात विधेयकाच्या बाजूने 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडले. तर 12 सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे बहुमतासाठी 352 मतं आवश्यक होती. मात्र मोदी सरकार दोन तृतियांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरलं. यानंतर राहुल गांधींनी तर थेट वर्मावरच बोट ठेवलंय. हे विधेयक महिला आरक्षणाचं नाही तर घटना पायदळी तुडवणारं होतं, अशा शब्दात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी हल्लाबोल केलाय. दुसरीकडे विरोधकांनी महिलांचा अपमान केल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केलीय. पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तमिळनाडूमध्ये एक व्हॅन दरीत कोसळली आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातून येणाऱ्या या व्हॅनचा अपघात झाला आहे. हा अपघात खूप भीषण होता. वलपराई-पोल्लाची या डोंगराळ भागातून व्हॅन जाताना हा अपघात झाला आहे.यात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चौघेजण जखमी आहेत. केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील १३ जणांना ही व्हॅन घेऊन जात होती. वलपराई-पोल्लाची या डोंगराळ भागातून खाली उतरत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. वळण घेत असताना व्हॅनने एका बॅरिकेटला धडक दिली आणि व्हॅन दरीत कोसळली. या व्हॅनचा चक्काचुर झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्जिकल स्ट्राईक नेपाळमधील भ्रष्टाचाराविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू झाली आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारने 2006 ते 2025-26 या काळात सार्वजनिक पद भूषवलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय न्यायिक समिती स्थापन केली आहे. या चौकशीत 2005-06 पासूनचे सर्व सात पंतप्रधानांचा यांचाही समावेश आहे. दोन अंतरिम सरकारांचे प्रमुख, यांचीही चौकशी केली जाईल. माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांचाही या चौकशीत समावेश असेल. तीन राष्ट्रपती त्यातील एक विद्यमान राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचीही चौकशी केली जाईल. ही चौकशी केवळ उच्चपदस्थ राजकारण्यांपुरती मर्यादित नाही; यात मंत्री, 100 हून अधिक घटनात्मक अधिकारी आणि वरिष्ठ नोकरशहा यांचाही समावेश असेल.सत्तेवर येण्यापूर्वी, बालेन शाह यांनी जनतेला वचन दिले होते की ते नेपाळमधून भ्रष्टाचार समूळ नष्ट करतील आणि दोषी अधिकारी व मंत्र्यांवर कारवाई केली जाईल. 27 मार्च रोजी मंत्रिमंडळाने 15 दिवसांच्या आत अशी यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जी आता पूर्ण झाली आहे. कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव आयपीएल 2026 च्या 25 व्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सने आपला दबदबा कायम राखत कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 5 गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात शुभमन गिलची तुफानी फलंदाजी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर गुजरातने गुणतालिकेत थेट टॉप-4 मध्ये एन्ट्री केली आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे केकेआरचा यंदाच्या हंगामातील संघर्ष अधिकच खडतर झाला आहे.या विजयासह गुजरात टायटन्सने 5 सामन्यांत तिसरा विजय नोंदवत 6 गुणांसह टॉप-4 मध्ये एन्ट्री घेतली. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 6 पैकी 5 सामन्यांत पराभव आणि एका सामन्यात पावसामुळे गुण विभागले गेल्याने केकेआर फक्त 1 गुणांसह गुणतालिकेत 10व्या स्थानावर घसरली आहे. फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! Top 10 News : बिग बॉस मराठीच्या सहावा सिझन’चा ग्रँड फिनालेचा एपिसोड लवकर होणार आहे. या रिअॅलिटी शोनं प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केलं. दरम्यान, शो शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलं असताना बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील धुरंधरांची धमाकेदार एन्ट्री झाली. प्रेक्षकांचे लाडके चेहरे पुन्हा एकदा या घरात परतले आहेत. मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरे, आणि मागील सिझनचे अजून काही धुरंधर या शोमध्ये येणार असल्याची माहिती आहे. हे दमदार खेळाडू टॉप 5 स्पर्धकांना भेटले असून, त्यांनी खेळावर भाष्य केलं आहे. मेघा धाडेने यावेळी इच्छा बोलून दाखवली. ‘या सिझनची विनर मुलगी व्हावी ‘, असं तिने म्हटलं आहे. तिच्या मते तन्वी कोलते किंवा राकेश बापट यामध्ये विनर व्हावा. तर पुष्कराच्या मते तन्वी कोलते विनर असेल. शिव ठाकरेची इच्छा आहे विशाल कोटियनने ट्रॉफी उचलावी. टॉप 5 स्पर्धकांसाठी ही भेट केवळ मनोरंजन नव्हती, तर अंतिम टप्प्यात स्वतःला अधिक सिद्ध करण्याची एक प्रेरणादायी संधी ठरली.