Top 10 News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत दाखले झाले होते. फडणवीस हे दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. तर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटले होते. त्यानंतर कालच्या दिल्ली दौऱ्यात फडणवीस यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचीही भेट घेतली. फडणवीस हे दावोस आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडला गेल्याने नितीन नवीन यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे फडणवीस यांनी नितीन नवीन यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली असल्याचे सांगण्यात येते. मात्र यादरम्यान, राजकीय घडामोडी घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. धाड टाकून 21 बांगलादेशी नागरिकांना अटक वर्सोवा पोलिसांकडून अंधेरी पश्चिम यारी रोड आणि माहीम परिसरात धाडी टाकून एकूण 21 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक अवैधरित्या भारतात दाखल होऊन कोलकातामधून थेट मुंबई शहरात दाखल झाले होते. वर्सोवा पोलिसांचा या कारवाईमध्ये 18 ट्रान्सजेंडर, 1 महिला, व 2 पुरुष असे 21 बांगलादेशी नागरिक अटक करण्यात आले आहेत. या आरोपीकडून वर्सोवा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक असल्याचा पुरावा देखील जप्त केला आहेत. याशिवाय मालाड पठाणवाडी परिसरातूनही चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. PMC Abhay Yojana : महापालिका अभय योजनेला पुन्हा मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत थकबाकी भरता येणार नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी मिटकरी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे नरहरी झिरवाळ यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते. राजेंद्र ढेरंग यांनी एका औषध दुकानदाराचा निलंबित परवाना पुन्हा देण्यासाठी लाच मागितली होती आणि हे पैसे स्वीकारताना राजेंद्र ढेरंग एसीबीच्या जाळ्यात सापडले होते. यावरून या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र मिटकरी यांनी या प्रकरणात नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याची सुपारी कोणी घेतली आहे, हे लवकरच समोर येईल, असा इशारा दिला आहे. Narhari Zirwal and Amol Mitkari राष्ट्रवादीचा अध्यक्षाची 15 दिवसात होणार निवड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्य आणि नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अखेर याला पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची घोषणा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली. येत्या पंधरा दिवसांत त्यांच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता १५ दिवसांत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. Pune News : २.५ TMC पाणी वाचणार! खडकवासला बोगद्याचं काम सुसाट; ‘बुमर’ मशिनचा धडाका सुरू जुन्या इमारती गुलामगिरीच्या प्रतीक होत्या – पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेबुला राजधानी दिल्लीतील नवीन PMO ‘सेवा तीर्थ’, तसेच कर्तव्य भवन-1 आणि कर्तव्य भवन-2 या प्रशासकीय संकुलांचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी हा क्षण भारताच्या विकास यात्रेतील नवा अध्याय असल्याचे सांगितले. तसेच नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक या इमारती ब्रिटिश साम्राज्याच्या मानसिकतेचे प्रतीक होत्या. आता गुलामीची चिन्हे दूर केली जात आहेत. स्वातंत्र्यानंतर याच इमारतींमधून देशासाठी महत्त्वाचे निर्णय झाले, धोरणे आखली गेली. पण या इमारती भारताला गुलामीच्या जाळ्यात ठेवण्यासाठी उभारल्या गेल्या होत्या. मात्र जुन्या इमारतींमध्ये घेतलेले निर्णय आणि त्या परिसरातील आठवणी कायम राहतील. त्यामुळे नॉर्थ आणि साउथ ब्लॉकचे रूपांतर राष्ट्रीय संग्रहालयात करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. BNP च्या भूमिकेमुळे भारत-बांगलादेश तणाव वाढण्याची शक्यता बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत तारिक रहमान यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने मोठा आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर बीएनपीने घेतलेल्या एका भूमिकेमुळे भारत आणि बांगलादेश मधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. बीएनपीने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशला सोपवण्यासंदर्भात पुन्हा भाष्य केले आहे. पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य सलाहुद्दीन अहमद म्हणाले, “आपला पक्ष सातत्याने मागणी करत आला आहे की, हसीना यांना बांगलादेशात आणावे आणि कायद्यानुसार खटला चालवण्यात यावा. तसेच, दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार हा मुद्दा सोडवावा. भारतही सहकार्य करेल, अशी अपेक्षा असल्याचेही अहमद यांनी म्हटले आहे. PM Modi Calls Tarique Rahman भारत-पाक सामना सामना रद्द होणार? आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी होणाऱ्या लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या या लढतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. पण नंतर यूटर्न घेत पाकिस्तानचा संघ या लढतीत खेळण्यास तयार झाला आहे. उद्या प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी फॅन्सच्या मनात प्रचंड उत्सुक्ता आहे. मात्र या सर्व उत्साहावर पाणी फेरलं जाऊ शकतं. श्रीलंकेच्या हवामान विभागाने रविवारी संध्याकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. असं झाल्यास हा सामना रद्द होऊ शकतो. आयुष बिग बॉसच्या घरातून गायब? बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून रोज नवीन ट्विस्ट येत आहे. मात्र गेल्या दोन दिवसात आयुष संजीव बिग बॉसच्या घरातून गायब झाल्याचे दिसत आहे. त्याचे कारण आता समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांचे एपिसोड पाहिले तर आयुष कुठेही दिसलेला नाही. एका वृत्तानुसार, आयुष आजारी पडला होता आणि बिग बॉसने त्याला आराम करण्याची परवानगी दिली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तो घरात दिसत नाही. तो अजूनही आजारी असल्याची शक्यता असून, त्याच्यावर डॉक्टरांचा औषधोपचार सुरू असल्याचा सांगितलं जात आहे. शिवाय आयुष या आठवड्यात नॉमिनेटेडही आहे. अमृता फडणवीसांचे ‘शंभू रे’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाशिवरात्रीचं औचित्य साधत नवीन गाणे ‘शंभू रे’ प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. या गाण्यातून शिवभक्तीचं दर्शन घडतं. यात अमृता फडणवीस यांचा एक वेगळा अवतार या गाण्यात पाहायला मिळत आहे.अमृता यांनी गायलेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार मॉन्टी शर्मा यांनी संगीत दिलं आहे. या गीतकार श्रीजन हे आहेत. तर म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन राजीव वालिया यांनी केलं आहे. व्हेलेंटाइनसाठी बाजारपेठ सज्ज प्रेमीयुगलांसाठी व्हेलेंटाइन डे खास असतो. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलटाइन वीकला सुरूवात झाली. तर आज व्हेलेंटाइन डे आहे. त्यासाठी शहरातील बाजारपेठ सज्ज झाली असून प्रेमी युगलांमध्ये उत्साह आहे. प्रेम यादिवशी व्यक्त करता येते. रंगीबेरंगी फुले, ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट, कपड्यांच्या दुकानांसह विविध वस्तुंनी बाजारपेठाही फुलल्या आहेत. शहरातील महाविद्यालयांचे कट्टे, कॉफी हाऊसेस, मॉलमध्ये सर्वत्र गुलाबी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटने व्हॅलेंटाइन कपलसाठी खास कॅण्डल लाइट डिनरच्या सवलती दिल्या आहेत. हेही वाचा: Jaykumar Gore : “हा प्रकल्प ठरेल राज्यासाठी रोल मॉडेल”; मंत्री जयकुमार गोरेंची वडूजमध्ये मोठी घोषणा