मुंबई – ‘कश्मीर फाईल्स’ फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच चर्चेत असतो. अग्निहोत्री यांचे चित्रपट देखील सर्वांचे लक्ष वेधणारे ठरतात. बॉलीवूडमध्ये खान स्टारचा दबदबा मोडत काढत अग्निहोत्री यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ताशकंद फाईल्स, चॉकलेट, कश्मिर फाईल्स असे दर्जेदार चित्रपट देऊन अग्निहोत्री यांनी सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप पाडली आहे.
अग्निहोत्री हे आपल्या वक्तव्यांमुळे कायम इंडस्स्ट्रीमध्ये चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एक ट्विट केलं आहे,ज्याची सिनेवर्तुळात जोरदार चर्चा आहे. या ट्विटमध्ये अग्निहोत्री यांनी नाव न घेता शाहरुख,सलमानला टोला लगावला आहे. “जोपर्यंत हे किंग, बादशाह आणि सुलतान बॉलीवूडमध्ये राहतील, तोपर्यंत हिंदी चित्रपट बुडत राहणार असल्याचे अग्निहोत्री आपल्या ट्विटमध्ये म्हणतो. “या इंडस्ट्रीला लोकांच्या कथेपासून बनलेली लोकांची इंडस्ट्री बनवा, तेव्हाच ती जागतिक चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करेल”, असे ट्विट अग्निहोत्री यांनी केले आहे.
As long as Bollywood has Kings, Badshahs, Sultans, it will keep sinking. Make it people’s industry with people’s stories, it will lead the global film industry. #FACT https://t.co/msqfrb7gS3
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 14, 2022
कश्मीर फाईल्स या चित्रपटामध्ये कश्मीरमधील पंडितांवर झालेल्या अन्यायाची गोष्ट अग्निहोत्री यांनी मोठ्या पडद्यावर मंडळी होती. पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम अग्निहोत्री यांनी वास्तवदर्शी पद्धतीने केल्यानंतर सिनेवर्तुळात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर अग्निहोत्री यांनी वारंवार इंडस्ट्रीमधील मुजोरपनाबाबत भाष्य केल्याचं पाहायला मिळालं होत.