Sayaji Shinde : मुलांना मारायला नको होतं.. सयाजी शिंदें स्पष्टचं बोलले; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मोठी प्रतिक्रिया
Sayaji Shinde : या आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तरुणांवर केलेल्या लाठीचार्जवर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Sayaji Shinde : २० जुलै या दिवशी ‘चलो संसद’चा नारा देत जंतर मंतर ते संसदभवन असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरल्याने दिल्तीत मोठा तणाव निर्माण झाला होता. हजारोंच्या संख्येने तरुणांनी संसद भवनाकडे धाव घेतल्यानंतर वाटेतच दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवलं.
पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी थेट तरुणांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईचा जाहीर निषेध सर्वच स्तरामधून नोंदवला जात असून, केंद्र सरकावर टीका केली जात आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, या आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तरुणांवर केलेल्या लाठीचार्जवर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Sayaji Shinde)
सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वास निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे (Sayaji Shinde)
मुलांना मारायला नको होतं..असं म्हणत सयाजी शिंदे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. “आपल्याच माणसाने आपल्यावरच लाठीचार्ज करणं योग्य नाही. शेवटी ही आपलीच माणसं आहेत. ती आपल्या चांगल्यासाठी, भविष्यासाठी भांडत आहेत. ही लोकशाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने लाठीचार्ज नव्हता करायला पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वास निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.” असं सयाजी शिंदे म्हणाले.
Eknath Shinde : ‘एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू असा हा दिवस’; एकनाथ शिंदेंची पोस्ट
…म्हणून आपण सरकारला निवडून देतो (Sayaji Shinde)
आंदोलनकांकडून तीन प्रमुख मागण्या केल्या जात आहेत, त्यापैकी एक म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. या मागणीवर आंदोलक ठाम असून, माघार घ्यायला तयार नाहीत. यावर बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, “राजीनामा म्हणजे सिस्टिम बदलली पाहिजे. ती व्यक्ती बदलली पाहिजे. कारण त्यांनी काय होत आहे, याकडे लक्ष दिलं नाही. चांगली सर्व्हिस मिळावी म्हणून आपण सरकारला निवडून देतो, त्यामुळे त्यांनी देखील तसं वागलं पाहिजे, मग असे आंदोलन कधीच होणार नाही.” अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर दिली.
तसेच सयाजी शिंदे यांनी सोनम वांगचुक यांच्या कामाचं देखील कौतुक केलं. ‘मी सोनम वांगचुक यांना खरंच मानतो, अशी माणसं फार दुर्मिळ आहेत. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलोय, बोललोय, आमचे विचार देखील जुळले असेही सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे.





