Chhatrapati Sambhajinagar : ‘माझ्या लाइफचं सोल्युशनच नाही…’; आई अन् बापाची धडपड व्यर्थ, तीन तासानंतर भयंकर शेवट! सहा वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
Chhatrapati Sambhajinagar : तिथेच असणाऱ्या मुलाच्या आईने देखील यानंतर उडी मारली. काही सेकंदात अख्य कुटुंब संपलं. या घटनेने संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मुलगा डोंगरावरुन उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला वाचण्यासाठी धाव घेतलेल्या वडीलांना जीव गमावावा लागला आहे. तिथेच असणाऱ्या मुलाच्या आईने देखील यानंतर उडी मारली. काही सेकंदात अख्य कुटुंब संपलं. या घटनेने संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
अवघ्या १८ वर्षांच्या मुलाचे आत्महत्या करण्यामागचे कारणही समोर आले आहे. मुलाने आयफोनच्या रागातून आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्या करण्यासाठी मुलगा डोंगरवरुन जीव देणार असल्याचे समजल्यानंतर त्याच्या वडीलांनी त्याची समजूत काढण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. २१ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत १८ वर्षांचा कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे या तिघांचा दुर्देवी अंत झाला.
अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं
मिळालेल्या माहितीनुसार, कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर कुणाल काल सकाळी सुमारे १० वाजता खवड्या डोंगरावर गेला. यानंतर वडील आणि आई त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणाचेही ऐकले नाही. यानंतर डोंगरच्या एका कठड्यावर तो उभा होता. त्यावेळी मुलगा ऐकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वडीलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. तेवढ्यात दोघांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांनाही उडी मारून जीवन संपवलं.
माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं
तुझा पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी आर्त विनवणी आई करत होती. आईच्या आर्त हाकेनंतरही कुणाल, आई, माझे कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं, असं कुणाल म्हणाला आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं. हाच शेवटचा संवाद आई आणि मुलामध्ये मृत्यूअगोदर झाल्याचे समजते.
मोठ्या मुलाचे सहा वर्षांपूर्वी निधन
समोर आलेल्या माहितीनुसार, चांदवडे कुटूंबात सहा वर्षापूर्वी एक दुर्देवी घडली होती. चांदवडे कुटुंबातील मोठ्या मुलाचे आजारपणामुळे निधन झाले होते. तेव्हापासून कुटुंबात कलह निर्माण होऊन सतत खटके उडत होते. मुरलीधर चांदवडे हे ट्रकचालक होते. त्यामुळे ते घरातून सतत बाहेर असायचे. गेल्या काही दिवसांपासून कुणालचा आणि त्याच्या वडीलांचा वाद सुरू होता. वडीलांकडून खर्चाला पैसे न मिळणे आणि आयफोनच्या मोबाईलचे हप्ते थकल्याची सल त्याच्या मनात घर करून बसली होती.
Nitin Nabin: २७ पैकी ७ राज्ये! भाजपच्या नव्या टीमची पहिली बैठक ; Gen Z साठी कोणता प्लॅन तयार करणार ?





