मालाला दर नाही.. तरी काळ्या आईची सेवा.! छातीइतक्या पाण्यात उभा राहून शेतकऱ्याने वाचवला ‘कांदा’

Updated On:

पुसेगाव : बुध पुसेगाव रस्त्यावर असलेल्या वेटणओढ्यावर (लक्ष्मीनगर) नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा आल्याने ऐरणीत साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागली. काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना या पाण्याच्या फुगवट्या मुळे मानसिक त्रासाबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

तर ओढ्यात प्रचंड पाणी असल्याने कोणत्याही प्रकारची यंत्रणा ओढ्या पलीकडे जाऊ शकत नसल्याने काही क्षेत्रात अद्याप पेरणीही झाली नाही. या वेटणओढ्यावर किमान साकव पूल तरी व्हावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

एप्रिल महिन्यात काढलेल्या कांदा पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने ऐरणीत साठवून ठेवलेला कांदा विक्री साठी बाहेर काढताना शेतकऱ्याला सध्याच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे.

होणाऱ्या नाहक त्रासाने या भागातील शेतकरी वर्ग चांगलाच मेटाकुटीला आला आहे. खटाव तालुक्याच्या उत्तर भागात ब्रिटिश कालीन नेर तलावाची पातळी काही प्रमाणात वाढवल्याने पाणी साठ्यात वाढ झाली, मात्र त्याची झळ आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना झाली आहे.

बुध नजीक असलेल्या काटेवाडी गावच्या शिवारातील शेतकऱ्यांची शेती अडचणीत आली आहे. अजित काकासो जगदाळे यांना वेटणओढ्याच्या पलीकडे शेतात ऐरणीत साठवलेला कांदा बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड आणि नाहक त्रास सोसावा लागला आहे.

ऐरणी पासून सुमारे ४००फूट अंतरावर नासीरभाईच्या टीमच्या १४ हमालांच्या साह्याने प्रति पिशवी ९० रुपये इतका खर्च करून छाती इतक्या पाण्यातून कांदा पिशव्या डोक्यावर काढाव्या लागल्या आहेत. मजुरांनी ही जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला मदत केल्याने समाधान व्यक्त होत आहे.एवढे करूनही कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

वेटणओढ्यात पाण्याचा फुगवटा गेली कित्येक वर्षे सातत्याने होत असल्याने या भागातील शेतकरी बैल किंवा यंत्राच्या मदतीने पेरणी करू शकत नाहीत. शेतकरी हात कोळप्याने काकऱ्या ओढून टोकण पद्धतीने का होईना शेती करत आहेत.

त्यामुळे या ओढ्यावर चांगला पुल व्हावा किमान साकव पूल तरी बांधण्यास या काटेवाडी शिवारातील सुमारे ६० एकर क्षेत्रातील शेती वहिवाटी खाली येईल. लोकप्रतिनिधीनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे .

आणखी संबंधित बातम्या

Pakistan news : शांतता चर्चेची पुढची फेरी पाकिस्तानात व्हावी.! पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अपेक्षा

2026-05-24 21:54:08

Pakistan news : शांतता चर्चेची पुढची फेरी पाकिस्तानात व्हावी.! पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अपेक्षा

Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त

2026-05-23 11:09:11

Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त

Pune News : महिनाभरातच उतरले प्रेमाचे रंग.! पालकांच्या इच्छेविरूध्द केलेले लग्नातील वादावर संवादातून घटस्फोट

2026-05-23 10:05:27

Pune News : महिनाभरातच उतरले प्रेमाचे रंग.! पालकांच्या इच्छेविरूध्द केलेले लग्नातील वादावर संवादातून घटस्फोट

Pune News : १३ हजार ७४४ विद्यार्थ्यांची आयटीआयसाठी नोंदणी

2026-05-23 09:00:49

Pune News : १३ हजार ७४४ विद्यार्थ्यांची आयटीआयसाठी नोंदणी

Pune News : "राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध" - दत्तात्रय भरणे

2026-05-23 08:36:15

Pune News : "राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध" - दत्तात्रय भरणे