Rahul Gandhi – राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदांवर ओबीसी, दलित आणि आदिवासींचे प्रतिनिधित्व नाही. संघटनेच्या उच्च रचनेचा आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांचा आढावा घेतल्यास या समुदायांची अनुपस्थिती दिसून येईल. तिथे दलित आणि मागासवर्गीयांसाठी कोणतेही स्थान नाही, असे प्रतिपादन काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले आहे. रायबरेलीचे खासदार असलेले राहुल गांधी सामाजिक न्याय आणि संविधानाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. लखनौ येथे पक्षाने आयोजित केलेल्या संविधान संमेलनात ते सहभागी झाले होते. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांना त्यांच्या जयंतीच्या दोन दिवस आधी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली. जर आज जवाहरलाल नेहरू जिवंत असते तर कांशीराम मुख्यमंत्री झाले असते. Rahul Gandhi दिवंगत नेत्याचा संघर्ष आणि दृष्टिकोन समकालीन राजकीय परिस्थितीनुसार होता, असेही ते म्हणाले. दरम्यान, ४,००० हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचा शेवट कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी करण्याच्या प्रस्तावाने झाला. काशीराम यांचा मोठा संदर्भ :Rahul Gandhi काशीरामा यांचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, त्यांचे राजकारण या कल्पनेत रुजलेले आहे की, विकासाचा लाभ समाजाच्या एका लहान वर्गाला दिला पाहिजे. विकासाचा फायदा सर्वात गरीब आणि सर्वात दुर्लक्षित लोकांनाही झाला पाहिजे. पण भारतातील प्रमुख संस्थामध्ये अजूनही देशाच्या सामाजिक रचनेचे प्रतिबिंब पाडत नाहीत. लोकसंख्येच्या मोठ्या भागांना, विशेषतः दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अत्यंत मागास गट आणि अल्पसंख्याकांना न्यायपालिका, नोकरशाही, मंत्रिमंडळ, शिक्षण व्यवस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कमी प्रतिनिधित्व आहे.