“…तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पक्ष फोडतील”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut On BJP | लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. त्यानंतर नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर आता लोकसभा अध्यक्षांची निवडणूक 26 जूनला होणार आहे. त्यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ही जोडी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा दावा राऊतांनी केला आहे.
“लोकसभा अध्यक्षपद महत्त्वाचं आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार चंद्रबाबू नायडू यांनी उमेदवार दिला, तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू. चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले असल्याचे आम्हाला समजले आहे, पण लोकसभेचे अध्यक्ष पद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलगू देशम चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष, चिराग पासवान यांचा पक्ष आणि नितेश कुमार यांचा पक्ष हे फोडल्याशिवाय राहणार नाहीत,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut On BJP |
“ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा”
पुढे ते म्हणाले, “लोकसभेचे अध्यक्ष पद हे अत्यंत महत्त्वाचा असते. महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पॉलिटिकल एजंट होते. राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली. Sanjay Raut On BJP |
“देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारले आहे नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. मोदींच्या झुंडशाहीचा हुकूमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केला. ते टेकूवर बसले असून तो कधीही कोसळू शकतो. त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाची हे योग्य पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे,” असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. Sanjay Raut On BJP |
हेही वाचा:
फादर्स डेच्या निमित्ताने वरुण धवनने आपल्या लेकीची दाखवली ‘पहिली झलक’ तर परिणितीने केली खास कमेंट





