Malegaon Bomb Blast | मालेगावमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने जाहीर केला. या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर 101 जण जखमी झाले होते. तब्बल 17 वर्षांनंतर विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी पुराव्याअभावी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या आरोपींमध्ये माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी यांचा समावेश होता.निकालानंतर या बॉम्बस्फोटात आपल्या कुटुंबीयांना गमावलेल्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. मृतांमध्ये फरहीन उर्फ शगुफ्ता शेख लियाकत, शेख मुश्ताक यूसुफ, शेख रफीक मुस्तफा, इरफान जियाउल्लाह खान, सय्यद अजहर सय्यद निसार आणि हारून शाह मोहम्मद शाह यांचा समावेश होता. या स्फोटात लियाकत शेख यांनी त्यांची 10 वर्षांची मुलगी फरहीन उर्फ शगुफ्ता शेख लियाकत गमावली. ही मुलगी भिक्खु चौकात वडापाव घेण्यासाठी गेली होती, पण ती परत आली नाही. जेव्हा लियाकत शेख यांना बॉम्बस्फोटाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना आशा होती की त्यांची मुलगी घरी परत येईल. पण काही वेळाने आणखी एक संदेश आला की त्यांची मुलगी फरहीनचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. एक पिता म्हणून ते आपल्या पत्नीसह त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी गेले, पण त्यांना तिला भेटू देण्यात आले नाही. सध्या, लियाकत शेख यांच्याकडे त्यांच्या या छोट्या मुलीचा एक छोटासा गोड फोटो आहे. लियाकत यांना आशा होती की त्यांना न्याय मिळेल, पण न्यायालयाच्या निकालाने त्यांनाही नाराजी व्यक्त केली आहे. Malegaon Bomb Blast | “निकाल पूर्णपणे चुकीचा, आम्हाला न्याय हवा” त्यांनी सांगितले, “हा निकाल पूर्णपणे चुकीचा आहे. हेमंत करकरे साहेबांनी अनेकांना पकडले होते, ते लोक कुठे गेले? त्यांनी काहीच केले नाही का? ज्यांना निर्दोष सोडले, त्यांनी बॉम्बस्फोट केला नसेल तर मग कोणी केला? आम्ही पुढे न्यायालयात जाऊ. हेमंत करकरे यांनी पुराव्यांच्या आधारेच त्यांना पकडले होते, पण आता काय झाले? माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? आम्हाला न्याय हवा आहे. माझ्या मुलीला न्याय द्या.” Malegaon Bomb Blast | पुरावे डावलून निकाल दिल्याचा आरोप मृतांपैकी एक सय्यद अजहर सय्यद निसार यांच्या वडिलांनी एका मुलाखतीत, “17 वर्षे उलटूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. सर्व पुरावे डावलून हा निकाल देण्यात आला आहे. आम्ही या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ.” विशेष एनआयए न्यायालय दरम्यान, या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाविषयी विशेष एनआयए न्यायालयाने म्हटले आहे की, “अभियोजन पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळे, आरोपींना संशयाचा फायदा मिळण्याचा अधिकार आहे.” त्याच वेळी, माजी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, ”न्यायालयाने निर्दोष मुक्तता करणे हा केवळ त्यांचा विजय नाही तर प्रत्येक ‘भगव्या’चा विजय आहे. गेल्या १७ वर्षांपासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, ‘भगव्या’चा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देव शिक्षा करेल.” असेही त्यांनी म्हटले. Malegaon Bomb Blast | हेही वाचा : solo travelers: जग भटकताना स्वतःला शोधणारे; सोलो ट्रॅव्हलर्सची क्रेझ निर्माण करणारी नवी पिढी