वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून जिंकून आणण्यासाठी बाहेरच्या गुंडांकडून स्थानिक नागरिकांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे येथील निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष होईल का? निवडणूक आयोगाची बंगालप्रमाणे वाराणसीमध्ये नजर का नाही, असा सवाल बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी केला.
वाराणसीमध्ये कोणत्याही परिस्थितीत मोदी यांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी गल्लीबोळात घरांमध्ये जाऊन मतदारांना आमिष दाखविले जात आहे असे त्या म्हणाल्या.