नगर – माळीवाडा येथील कचरा रॅम्प हटविण्याचे आश्वासन मनपाने पाळले नाही. त्यामुळे आयुक्त व महापौरांच्या गाडीवर कचरा टाकण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.
माळीवाडा येथील कचरा रॅम्प हटविण्यासाठी 19 जुलै रोजी विद्यार्थ्यांसह आंदोलन केले होते. त्यावेळी 45 दिवसात हा कचरा रॅम्प हटविला जाईल व चार नवीन गाड्या खरेदी केल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनास 50 दिवस होऊन गेले आहेत. त्यामुळे येत्या पाच दिवसांत हे आंदोलन चिळणार असून, कचरा गाड्या रॅम्पपर्यंत जाऊ देणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने कचरा गाड्या व त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, वेळ पडल्यास आयुक्त व महापौरांच्या गाडीवरही कचरा टाकण्यात येईल, असे नितीन भुतारे यांनी म्हटले आहे.