Rohit Pawar : आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा : रोहित पवारांची मोठी मागणी
Rohit Pawar : मात्र, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर काही सवाल उपस्थित करत मोठी मागणी केली आहे. यासंबंधी त्यांनी एक्सवरून ट्वीट करत जाब विचारला आहे.

Rohit Pawar : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या भरतीचा पेपर फुटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएसीने घेतलेल्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. मात्र, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर काही सवाल उपस्थित करत मोठी मागणी केली आहे. यासंबंधी त्यांनी एक्सवरून ट्वीट करत जाब विचारला आहे.
पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे रोहित पवार एक्सवरील ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा तसेच आम्ही ज्या एजंट लोकांची नावे दिली होती त्यांचे काय झाले? आयोगातून कोणी सहभागी आहे का? कोणाचा वरदहस्त आहे? हे देखील सांगावे. असे सवाल विचारले आहेत. तसेच आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
#पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर… pic.twitter.com/OZMkg6pplf
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2026
आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा : रोहित पवारांची मागणी
आयोगाचा पेपर लीक होणे ही साधारण घटना नसून अत्यंत गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने देखील स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी, अशी मागणीही रोहित पवारांनी केली आहे. त्यांनी केलेल्या या मागणीवर एमपीएससी आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नव्याने भरती प्रक्रिया राबवली जाणार
औषध निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी आणि गैरप्रकारांची चौकशी व्हावी, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली होती. आता आयोगाने ही भरती प्रक्रियेता रद्द केल्याने विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. आता संबंधित पदाची भरती प्रक्रिया नव्याने कशा पद्धतीने राबवली जाणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. सध्या याबाबत माहिती समोर आलेली नसली तरी लवकरच पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे समजते.
Vasundhara Hill : ‘एक पेड पुनित दादा के नाम’ अभियानांतर्गत वसुंधरा टेकडीवर वृक्षारोपण






