Thalapathy Vijay : आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात रंगलेल्या युतीच्या चर्चांना तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे अध्यक्ष आणि सुपरस्टार विजय (Thalapathy Vijay) यांनी पूर्णविराम दिला. मामल्लापुरम येथे आयोजित इफ्तार कार्यक्रमात बोलताना त्यांनी रालोआसोबत युती करण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या असून, आगामी निवडणुकीत कोणाशीही तडजोड न करण्याचे स्पष्ट संकेत (Thalapathy Vijay) दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विजय यांचा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यावर भाष्य करताना विजय म्हणाले की, आपल्या पक्षाबाबत जो युतीचा प्रचार केला जात आहे, तो पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. अशा अफवांनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, परंतु पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. Thalapathy Vijay विजय (Thalapathy Vijay) यांनी अत्यंत ठामपणे सांगितले की, टीव्हीके हा जनतेचा पक्ष असून तो कोणत्याही पक्षाची बी-टीम म्हणून काम करत नाही. आम्ही आमच्या धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर तामिळनाडूमध्ये आमचेच सरकार सत्तेत असेल आणि त्याचे नेतृत्व आमच्या पक्षाकडेच राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.