Team India Schedule : BCCI चा मोठा निर्णय ! IPL दरम्यान बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर

मुंबई : सध्या आयपीएल हंगाम चांगलाच गाजताना दिसत आहे. या सिझनमध्ये अनेक रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. यादरम्यान बीसीसीआयने एक मोठी घोषणा (Team India Schedule) केली आहे. टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दौऱ्यात भारतीय वरिष्ठ पुरुष संघ बांगलादेशविरुद्ध तीन टी-20 सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
कसा आहे बांगलादेश दौरा?
बांगलादेश दौऱ्यामधील पहिला सामना 17 ऑगस्टला तर दुसरा सामना 20 ऑगस्टला होणार आहे. हे दोन्ही सामने मीरपूर येथे खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यातला तिसरा एकदिवसीय सामना 23 ऑगस्टला चट्टग्राम येथे खेळवला जाणार आहे. तर पहिला T20 सामना 26 ऑगस्टला चट्टग्राम येथे खेळाळला जाणार आहे. दुसरा T20 सामना 29 ऑगस्टला मीरपूर येथे तर तिसरा शेवटचा T20 सामना 31ऑगस्टला खेळवला जाणार आहे. तिसरा सामनादेखील मीरपूर येथे खेळवला जाणार आहे.
या दौऱ्यासाठी अजूनही खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची लढत इंग्लडसोबत होणार आहे. इंग्लड विरुद्ध भारत त्यांचा पहिला सामना 20 जून ते 24 जून 2024 ला हेडिंग्ले येथे खेळेल तर, दुसरा सामना 2 ते 6 जुलै बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल.तर टेस्ट सिरीजचा तिसरा सामना 10 ते 14 जुलैला लॉर्ड्स स्टेडियमवर खेळाला जाणार आहे. चौथा सामना 23 ते 27 जुलैला ओल्ड ट्रॅफोर्ड येथे खेळाला जाणार आहे. पाचवा सामना 31 ते 4 ऑगस्टला ओव्हल येथे खेळला जाणार आहे.
हा दौरा दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आगामी ICC स्पर्धांसाठी तयारीचा हा एक महत्त्वाचा टप्पा (Team India Schedule) असणार आहे. या दौऱ्यात टी-20 मालिकेत युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर एकदिवसीय मालिकेमध्ये मुख्य खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.





