Shailesh Chandra : इंधन दरवाढीचा वाहन बाजाराला फटका बसणार? टाटा मोटर्सचे एमडी शैलेश चंद्र यांनी व्यक्त केली चिंता
Shailesh Chandra :

Shailesh Chandra : इंधन दरवाढ आणखी काही काळ चालू राहीली तर वाहनाच्या मागणीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. प्रवासी वाहनांच्या विक्रीत आर्थिक वर्ष 2027 साठीचा 10 टक्के वाढीचा अंदाज आताच बदलणे घाईचे ठरेल, असे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्र म्हणाले.
गेल्या 10 दिवसांत इंधनाचे दर चार वेळा वाढल्याने, ग्राहकांच्या मागणीवर होणार्या परिणामाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे, असे ते नेक्स्ट जनरेशन टियागोच्या लॉन्चप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
ते म्हणाले की, याचा परिणाम विविध विभागांमध्ये वेगवेगळा असू शकतो आणि काहींमध्ये तो ’अधिक ठळक’ असू शकतो. त्यांनी पुढे असा इशारा दिला की, डिझेलच्या वाढलेल्या किमतींचा महागाईवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे ग्राहकांच्या भावना आणि खर्चाच्या पद्धतींवर परिणाम होऊ शकतो.
वापरलेल्या गाड्यांच्या बाजारातील मंदी हे ग्राहकांच्या भावना कमकुवत होत असल्याचे लक्षण आहे. महागाईच्या चिंतेमुळे लोक पैसे वाचवण्यासाठी खर्चात कपात करू शकतात. टीएमपीव्हीने पेट्रोल, आयसीएनजी आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमध्ये ’द नेक्स्ट जनरेशन टियागो’ सादर करून, परवडणार्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
ईव्हीच्या मागणीबद्दलच्या दुसर्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रा म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. अलीकडील इंधन दरवाढीच्या आधीच, कदाचित वाढत्या परिचालन खर्चाच्या अपेक्षेमुळे, ईव्हीच्या मागणीला गती मिळू लागली होती. सध्या, आम्ही ईव्हीसाठी दरमहा सरासरी 10,000 युनिट्सचे उत्पादन करत आहोत. दरमहा 10,000 युनिट्सचे उत्पादन 50,000 पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.





