Taslima Nasrin: तब्बल २० वर्षांनंतर तस्लिमा नसरीन कोलकात्याला परतल्या ; त्यांच्या येण्याने गोंधळ का उडाला ?
Taslima Nasrin: प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन जवळपास दोन दशकांनंतर कोलकात्याला परतल्या. अन्याय दीर्घकाळ टिकू शकतो, पण तो कायमचा नसतो, याचा पुरावा म्हणजे आपले परतणे, असे त्यांनी म्हटले.

Taslima Nasrin: प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन जवळपास दोन दशकांनंतर कोलकात्याला परतल्या. अन्याय दीर्घकाळ टिकू शकतो, पण तो कायमचा नसतो, याचा पुरावा म्हणजे आपले परतणे, असे त्यांनी म्हटले.
लेखकांना त्यांच्या मतांसाठी देश सोडून जाण्यास भाग पाडले जाणार नाही, त्या दिवसाची त्यांनी आतुरतेने वाट पाहत असल्याचेही सांगितले. दरम्यान, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, जेव्हाही त्या राज्यात येतील तेव्हा त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवली जाईल.
कोलकात्याला परतल्यावर तस्लिमा नसरीन भावुक झाल्या
कोलकात्यात काल आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात तस्लिमा नसरीन यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.यावेळी त्यांनी, “या शहरात परतणे म्हणजे आपल्या मागे सोडलेल्या आयुष्याच्या एका भागात परतण्यासारखे आहे. भविष्यात कोणत्याही लेखकाला आपली मते व्यक्त करण्यासाठी निर्वासित म्हणून राहावे लागू नये, ही आपली सर्वात मोठी इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
तस्लिमा म्हणाल्या, “अन्याय दीर्घकाळ टिकू शकतो, पण तो कधीही कायमचा नसतो, याचा पुरावा म्हणजे माझे परतणे. कोणत्याही लेखकाला आपल्या देशातून निर्वासित व्हावे लागणार नाही, त्या दिवसाचे मी स्वप्न पाहते.”
मी महिलांच्या हक्कांविषयी बोलण्यासाठी आले Taslima Nasrin:
तस्लिमा नसरीन यांनी स्पष्ट केले की, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे त्यांचा कोणताही राजकीय हेतू नाही. त्या म्हणाल्या की, त्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात बोलण्यासाठी आलेल्या नाहीत. महिलांच्या हक्कांविषयी बोलणे हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे.
त्या म्हणाल्या की, युरोपने त्यांना नागरिकत्व आणि राहण्यासाठी जागा दिली, परंतु बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांना राहण्यासाठी एक छोटी जागाही मिळू शकली नाही. तस्लिमा म्हणाल्या की, कोणत्याही न्यायालयाने त्यांना कधीही दोषी ठरवले नाही, परंतु आपली मते उघडपणे मांडल्यामुळे त्यांना कट्टरतावाद्यांचा विरोध आणि हद्दपारीची किंमत मोजावी लागली.
शुभेंदू अधिकारी यांनी सुरक्षेचे आश्वासन दिले
रवींद्र सदनात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांनी तस्लिमा नसरीन यांचे स्वागत केले आणि जेव्हाही त्या पश्चिम बंगालला भेट देतील तेव्हा राज्य सरकार त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवेल, असे आश्वासन दिले.
ते म्हणाले, “मुख्यमंत्री आणि पोलीस विभागाचे प्रभारी म्हणून, जेव्हाही तुम्ही पश्चिम बंगालला भेट द्याल तेव्हा तुम्हाला पूर्ण सुरक्षा मिळेल याची खात्री करणे हे माझे कर्तव्य आहे.”
त्यांनी असेही सांगितले की, तस्लिमा जेव्हा आणि जितक्या वेळा इच्छित असतील तेव्हा पश्चिम बंगालला भेट देऊ शकतात. सुभेंदू अधिकारी यांनी दावा केला की, सरकार बदलल्याने राज्यही बदलले आहे आणि आता संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क संरक्षित आहेत.
२००७ मध्ये कोलकाता सोडावे लागले Taslima Nasrin:
तस्लिमा नसरीन २००४ ते २००७ पर्यंत कोलकाता येथे राहिल्या. त्यांच्या ‘द्विखंडितो’ या आत्मचरित्रातील काही भागांवरून झालेल्या विरोधामुळे तत्कालीन डाव्या आघाडी सरकारने या पुस्तकावर बंदी घातली. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन, नोव्हेंबर २००७ मध्ये त्यांना कोलकाता सोडण्यास भाग पडले.
आपल्या लिखाणामुळे इस्लामी कट्टरवाद्यांकडून धमक्या मिळाल्यानंतर तस्लिमा यांनी यापूर्वी १९९४ मध्ये बांगलादेश सोडला होता. तेव्हापासून त्या निर्वासित म्हणून राहत आहेत.






