West Bengal Cabinet : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने राज्यात पहिल्यांदाच सरकार स्थापन केले आहे. आज ९ मे रोजी सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत भाजपच्या इतर पाच आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते कोण आहेत ते पाहूयात…. १ अग्निमित्रा पॉल? राजकारणात येण्यापूर्वी अग्निमित्रा पॅाल या फॅशन डिझायनर होत्या. त्यांनी वनस्पतीशास्त्र (ऑनर्स) मधील बी.एस्सी, फॅशन टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा आणि एमबीए या पदव्या संपादित केल्या आहेत. अग्निमित्रा या पश्चिम बंगालमधील भाजपच्या राज्य उपाध्यक्ष आहेत. त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. त्या कायस्थ समाजातून येतात. जो बंगालमधील भाजपचा एक महत्त्वाचा मतदार मानला जातो. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तापस बॅनर्जी यांचा ४०,८३९ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करून आसनसोल दक्षिण विधानसभा जागा जिंकली आहे. बेकायदेशीर जमाव आणि हिंसक आंदोलनांशी संबंधित २३ फौजदारी खटले प्रलंबित आहेत, तथापि त्यांना अद्याप कोणत्याही खटल्यात दोषी ठरवण्यात आलेले नाही. २ दिलीप घोष दिलीप घोष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक राहिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला एक मजबूत राजकीय शक्ती बनवण्याचे आणि राज्यातील आदिवासी भागांमध्ये व बूथ स्तरावर पक्षाचे तळागाळातील जाळे स्थापित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. ते स्वतः एक ओबीसी नेते असल्याने त्यांनी राज्यातील मागासलेल्या समाजांना भाजपशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. West Bengal Cabinet : पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू सरकार! ‘या’ पाच आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ त्यांनी २०१५ ते २०२१ पर्यंत बंगाल भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले पाहिले आहे. २०१६ मध्ये त्यांनी खरगपूर सदर विधानसभा जागा जिंकली आणि २०१९ मध्ये ते मेदिनीपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या पूर्वीच्या जागेऐवजी बर्दवान-दुर्गापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु ते टीएमसीचे कीर्ती आझाद यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना खरगपूर सदर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. जिथे त्यांनी टीएमसीचा पराभव केला. ३ निशित प्रमाणिक निशित प्रमाणिक हे कूचबिहार भागातील एक मोठं नाव असून, २०२१ ते २०२४ या काळात मोदी सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते राजवंशी समाजाचे आहेत. २०२१ च्या मंत्रिमंडळ फेरबदलादरम्यान ते वयाच्या ३५ व्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री बनले. त्यांनी २०१९ ते २०२४ पर्यंत कूचबिहारमधून लोकसभेचे खासदार म्हणून काम केले. ते पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यही राहिले आहेत, जिथे त्यांनी २०२१ मध्ये दिनहाटा आणि २०२६ मध्ये माथाभंगा येथून निवडणूक जिंकली. मार्च २०१९ मध्ये भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी ते तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते. २०२१ मध्ये विरोधी पक्षाने आरोप केला की ते बांगलादेशी नागरिक आहेत, जो सत्ताधारी पक्षाने पूर्णपणे निराधार म्हणून फेटाळून लावला. ४. अशोक कीर्तनिया २०२६ च्या निवडणुकीत अशोक कीर्तनिया यांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बोंगाव उत्तर अनुसूचित जाती (SC) राखीव जागेवर तृणमूल काँग्रेसचे बिस्वजीत दास यांचा पराभव करून विजय मिळवला. त्यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही त्याच जागेवरून टीएमसीच्या श्यामल रॉय यांचा १०,४८८ मतांनी पराभव केला होता. अशोक कीर्तनिया ५२ वर्षांचे असून ते व्यवसायाने राजकारणी आणि व्यावसायिक आहेत. त्यांनी १९९३-९४ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून कला शाखेत बी.ए. पदवी मिळवली. ते मतुआ समाजातील एक प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्यावर तीन गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांमध्ये हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. तथापि त्यांना आतापर्यंत कोणत्याही खटल्यात दोषी ठरवण्यात आलेले नाही. ५. क्षुदिराम टुडू भाजपच्या या आदिवासी नेत्याने २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत बांकुरा जिल्ह्यातील राणीबांध अनुसूचित जमाती (एसटी) राखीव जागा जिंकली. ५५ वर्षीय क्षुदिराम टुडू हे एका शासकीय अनुदानित शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी १९९४ मध्ये विद्यासागर विद्यापीठातून बी.ए. आणि २००० मध्ये बर्दवान विद्यापीठातून बी.एड. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी खटला नाही. हेही वाचा : Rinku Rajguru and Akash Thosar : आर्ची-परश्या एकत्र; कार्यक्रमाला लावली हजेरी