Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेट संघाने ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 मध्ये इतिहास रचला आहे. मागील रविवारी (८ मार्च २०२६) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव केला. भारताने २० षटकांत २५५/५ धावा केल्या, तर न्यूझीलंड १९ षटकांत १५९ धावांवर ऑलआउट झाला. या विजयामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आणि एकूण तिसऱ्यांदा हा खेळीचा मान मिळवला. संपूर्ण देशात जोरदार सेलिब्रेशन झाले. सूर्यकुमार यादवचा खुलासा (Suryakumar Yadav) विश्वचषक संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एक मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की, उपकर्णधार अक्षर पटेल सुपर-८ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात टीममधून वगळल्याने खूप रागावला होता. हा सामना भारताने ७६ धावांनी गमावला होता, जो त्यांच्या संपूर्ण मोहिमेतील एकमेव पराभव ठरला. “अक्षर खूप रागावलेला होता. त्याने रागावलं सुद्धा पाहिजे कारण तो टीममधील अनुभवी खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये एका टीमचं नेतृत्व करतो. तो रागावलेला. मी त्याची माफी मागितली. मी म्हटलं त्याला मी चुकलो. पण संघासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता.” Suryakumar Yadav सूर्यकुमार पुढे म्हणाले की, हा संवाद इतका सहज आणि सोपा नव्हता. अक्षर पटेलला दोन सामन्यांत (दक्षिण आफ्रिका आणि एका अन्य सामन्यात) वगळण्यात आले होते. हे रणनीतिक निर्णय होते, पण अक्षरला ते मान्य नव्हते. ‘त्या’ पराभवानंतरची टीमची भूमिका Suryakumar Yadav सूर्यकुमारने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव डोळे उघडणारा ठरला. “मला टीमवर अजिबात डाऊट नव्हता. त्यानंतर आम्ही प्रत्येक सामना बादफेरीची मॅच असल्यासारखे खेळलो.” झिम्बाब्वेविरुद्धचा सामना प्री-क्वार्टर फायनल आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना क्वार्टर फायनलसारखा खेळला गेला. या घटनेनंतर टीम एकजुटीने पुढे गेली आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडला तर फायनलमध्ये न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवले. भारताचा T20 विश्वचषक प्रवास Suryakumar Yadav भारताने या विश्वचषकात एकूण ९ सामने खेळले, त्यापैकी फक्त एक पराभव सहन करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीमने दमदार कामगिरी करत इतिहास घडवला.