Supreme Court : मोठी बातमी..! ठाकरेंच्या बंडखोर ६ खासदारांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Supreme Court : ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण तापलेले असतानाच, देशाच्या सर्वोच्च न्यायालयातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

Supreme Court : शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, बंडखोर लोकप्रतिनिधींविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारण्यास नकार देत फेटाळून लावली. (Supreme Court)
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षांतर करणाऱ्या आणि कथित दबावाखाली पक्ष बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अनेक प्रश्न विचारले. (Supreme Court)
न्यायालयाने विचारले की, ही याचिका नेमक्या कोणत्या पक्षासंदर्भात आहे? मात्र याचिकेत कोणत्याही विशिष्ट पक्षाचे किंवा लोकप्रतिनिधींचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. (Supreme Court)
याचिकेत काय म्हटले होते?
याचिकाकर्ते वकील जया सुकिन यांनी दाखल केलेल्या याचिकेत, लोकप्रतिनिधींवर पक्ष बदलण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, पूर्व भारतातील एका राज्यात आणि मध्य भारतातील दुसऱ्या राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असून त्यामुळे लोकशाही धोक्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, याचिकेत कोणत्याही पक्षाचे नाव किंवा या आरोपांना समर्थन देणारे ठोस पुरावे सादर करण्यात आले नव्हते. (Supreme Court)
सरन्यायाधीशांचे स्पष्ट निरीक्षण
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले, “तुम्ही मला एक मिनिट मागितला होता, पण मी तुम्हाला सात मिनिटे दिली. मात्र ही याचिका अत्यंत अस्पष्ट आहे. तुम्ही केलेले आरोप केवळ सामान्य स्वरूपाचे आहेत. त्यांना आधार देणारा कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही.” याच कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. (Supreme Court)
महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष
दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांकडून स्वतंत्र मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Supreme Court)






