Prakash Ambedkar : कागदोपत्री घोडे नाचवणं थांबवा; ठोस कारवाई करा, पहलगाम हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सरकारलं सुनावलं

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेत सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकारने तेथील पर्यटकांना बाहेर काढलं. ही चूक केली. खरं तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा होता, पर्यटकांच्या मनात भीती नव्हती. त्यांना सुरक्षा मिळणार की नाही हा प्रश्न होता. पाहिजे तर सरकारने पर्यटकांचा खर्च करायला हवा होता. हल्ला होवूनही पर्यटक आहेत आणि स्थानिक मदत करत आहेत. तर पर्यटकांना बाहेर काढलं नसतं त्यांना सुरक्षा दिली असती तर कळलं असतं, परिस्थिती कळाली असती की, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
वर्ड बँकेची गॅरंटी काय? केंद्र सरकारनं सांगावं
पुढे बोलताना म्हणाले की, झेलम , चिनाब पाणी करार स्थगित करण्याचा पाणी सांगितला जात आहे. नद्याचं पाणी भारतीय सरकार वापरणार कसं याचा खुलासा केला नाही. त्याची खोली वाढवणार आहोत किंवा पाणी कसे अडवणार हे सांगितलं नाही. वर्ड बँकेची गॅरंटी आहे, त्याचं परिणाम काय होणार आहे, हे केंद्र सरकारने सांगावं. सामान्य माणूस हे विचारात आहेत, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
इतकी हत्यार, विमान घेतली, त्याचा उपयोग काय?
तसेच इतकी हत्यार विकत घेतली आहेत, विमान घेतली त्याचा उपयोग काय? केंद्र सरकारला तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? कागदोपत्री घोडे नाचवणं थांबवा. ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. ज्याची कमतरता आहे ती पॉलिटिकल विंगची आहे, राजकीय कमतरता आहे. निर्णय घ्यायला शासनाला लोकांचा पाठिंबा आहे. लोक शासनाच्या पाठीशी उभे राहतील, असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्र्याचे चितावणीखोर वक्तव्य
दरम्यान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी चितावणीखोर वक्तव्य केले आहे. माजी परराष्ट्र मंत्री एका कार्यक्रमात बोलताना भारताबद्दल गरळ ओकली आहे. “सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहेल,” असं म्हणत त्यांनी भारताला धमकी दिली आहे. सिंधू नदीच्या काठावर असलेल्या सखलमध्ये त्यांनी एका रॅलीत हे विधान केले.





