कोलंबो – अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या श्रीलंकेच्या नागरिकांना तेथून सोडवण्याची मागणी श्रीलंकेने भारताकडे केली आहे. अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांना सोडवणे ही श्रीलंकेची प्रथमिकता आहे.
त्यासाठी भारताने सहाय्य करावे, अशी अपेक्षा श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटन आणि पाकिस्तानकडेही अशी अपेक्षा करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रानेही या संदर्भात श्रीलंकेला सहाय्य करावे, अशी अपेक्षा करण्यात आली आहे.
अफगाणिस्तानात अडकलेल्या 86 नागरिकांपैकी 46 जणांना यापूर्वीच सोडवण्यात आले आहे. आणखीन 20 जणांना सोडवण्यात येणार आहे तर 20 जणांनी अफगाणिस्तानातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानातील महिलांना काम करण्याची आणि मुलींना शाळेत जाण्याची परवानगी देण्याच्या तालिबानच्या निर्णयाचेही श्रीलंका सरकारने स्वागत केले आहे. तेथील नागरिकांची कर्जमाफी करण्याचेही श्रीलंकेने स्वागत केले आहे.