Sonia Gandhi: संपूर्ण वंदे मातरम गाण्याला सोनिया गांधींचा आक्षेप ; भाजपच्या आरोपांवर काँग्रेसचे प्रत्युत्तर
Sonia Gandhi: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते.

Sonia Gandhi: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर संपूर्ण ‘वंदे मातरम’ गायल्याबद्दल सोनिया गांधी यांनी आक्षेप घेतल्याचा दावा केला जात आहे. भारतीय जनता पक्षाने यावर टोला लगावला. यावर काँग्रेस पक्षाने उत्तर दिले की, संपूर्ण ‘वंदे मातरम’ गायले गेले आणि कोणीही त्यात व्यत्यय आणला नाही.
आज काँग्रेसच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात संपूर्ण ‘वंदे मातरम’ गायल्याबद्दल विचारले असता, पक्षाचे खासदार जयराम रमेश म्हणाले, “आज इंदिरा भवनमध्ये संपूर्ण ‘वंदे मातरम’ गायले गेले आणि त्याबद्दल कोणताही वाद नाही. ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही.” काँग्रेस अध्यक्ष बराच वेळ उभे असल्याने सोनिया गांधी त्यांच्यासाठी खुर्ची आणायला सांगत होत्या.
सोनिया गांधींनी हातवारे करून गाणे थांबवण्याचा इशारा केला Sonia Gandhi:
या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सोनिया गांधी हातवारे करून गाणे थांबवण्याचा इशारा करताना दिसत आहेत. त्यांच्या बाजूला मल्लिकार्जुन खर्गे देखील उभे होते. असे करताना राहुल गांधीही हातवारे करत होते. या विषयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते शकील अहमद म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’चे दोन कडवे नेहमीच गायले जातात.
यावेळी सहा कडवी गायली गेली, असेही ते म्हणाले. शकील अहमद म्हणाले की, काँग्रेसचा ‘वंदे मातरम’शी दीर्घकाळचा संबंध आहे आणि स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये हे गीत गायले जात आहे.
लाल किल्ल्यावर ‘वंदे मातरम’चे पूर्ण गीतही गायले गेले
या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान लाल किल्ल्यावर ‘वंदे मातरम’चे पूर्ण गीत गायले गेल्याची बातमीही चर्चेत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करण्यापूर्वी हे राष्ट्रगीत गायले गेले. वंदे मातरम हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक आहे. हे हिंदू परंपरेशी संबंधित एक महत्त्वाचे गीत असून, त्यातील निवडक श्लोक दीर्घकाळापासून राष्ट्रीय समारंभांमध्ये वापरले जात आहेत.
वंदे मातरम संबंधी कायदा Sonia Gandhi:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संमतीनंतर, ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) कायदा, २०२६’ ऑगस्ट २०२६ मध्ये अंमलात आला. या नवीन कायद्यानुसार, ‘जन गण मन’ प्रमाणेच ‘वंदे मातरम’ला कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. आता, ‘वंदे मातरम’ गाण्यात हेतुपुरस्सर अडथळा आणणे किंवा त्याचा अपमान करणे कायद्यानुसार शिक्षेस पात्र ठरेल.





