“गाझामधील अत्याचारांवर मोदींचे मौन लज्जास्पद…” ; सोनिया गांधींनी परराष्ट्र धोरणावर उपस्थित केले प्रश्न

Sonia Gandhi on Prime Minister। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गाझामध्ये इस्रायली संरक्षण दलांनी (आयडीएफ) लादलेल्या लष्करी नाकेबंदी आणि त्याठिकाणच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी याविषयी बोलताना “या नाकेबंदीमुळे गाझामधील परिस्थिती आणखी भयानक बनली आहे, ज्याठिकाणी लोक जीवन आणि मृत्यूशी झुंजत आहेत” असे त्यांनी म्हटले.
एका प्रतिष्ठित वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या त्यांच्या लेखात, सोनिया गांधी यांनी या नाकेबंदीला मानवतेविरुद्धचा एक भयानक गुन्हा म्हटले आहे आणि या प्रकरणात आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार असणाऱ्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या लेखात,”गाझामधील इस्रायली संरक्षण दलांनी केवळ लष्करी कारवाया तीव्र केल्या नाहीत तर औषधे, अन्न आणि इंधन यासारख्या आवश्यक पुरवठ्यात जाणूनबुजून व्यत्यय आणला आहे. या क्रूर रणनीतीमुळे गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना भूक, रोग आणि वंचिततेच्या उंबरठ्यावर आणले आहे.” असे म्हटले आहे.
‘पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत’ Sonia Gandhi on Prime Minister।
सोनिया गांधींनी त्यांच्या लेखात, ‘नाकेबंदीमुळे गाझाच्या पायाभूत सुविधांचा अंदाधुंदपणे नाश झाला आहे आणि नागरिकांच्या बेलगाम हत्याकांडामुळे मानवनिर्मित शोकांतिका निर्माण झाली आहे.’असे म्हणत त्याठिकाणच्या परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली .
‘लोक जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंजत आहेत’ Sonia Gandhi on Prime Minister।
या नाकाबंदीमुळे गाझामधील लोकांना केवळ मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात नाही तर त्यांचा जगण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे. रुग्णालयांमध्ये औषधांचा अभाव, अन्नाची उपलब्धता आणि इंधनाच्या कमतरतेमुळे लाखो लोकांना जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंजावे लागत आहे. त्यांनी याला उपासमारीने मरण्यास भाग पाडण्याची रणनीती म्हटले आणि ते मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हटले.
सोनिया गांधी यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात भारताच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना सोनिया गांधी यांनी लिहिले की, “गाझामधील लोकांवर इस्रायलकडून होणाऱ्या अत्याचारांवर पंतप्रधान मोदींचे मौन निराशाजनक आणि लज्जास्पद आहे. भारताने नेहमीच प्रतिनिधित्व केलेल्या वारशाच्या वतीने स्पष्ट आणि जोरदारपणे बोलण्याची वेळ आता आली आहे.” असे त्यांनी म्हटले.





