Sonam Wangchuk : लडाखच्या हक्कांसाठी सोनम वांगचुक यांची मोठी घोषणा ! लोकांना केले ‘हे’ आवाहन
हवामान कार्यकर्ते, संशोधक आणि लेह ॲपेक्स बॉडीचे (एलएबी) नेते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी लडाख केंद्रशासित प्रदेशाची संस्कृती, पर्यावरण आणि लोकशाही यांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी २३ सप्टेंबर रोजी लडाखमध्ये २० किमी लांबीची पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे.

Sonam Wangchuk : हवामान कार्यकर्ते, संशोधक आणि लेह ॲपेक्स बॉडीचे (एलएबी) नेते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी लडाख केंद्रशासित प्रदेशाची संस्कृती, पर्यावरण आणि लोकशाही यांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी २३ सप्टेंबर रोजी लडाखमध्ये २० किमी लांबीची पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे.
रात्रीच्या वेळी असलेल्या कडाक्याच्या थंडीसह सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे, आम्ही या पदयात्रेचे रूपांतर २३ सप्टेंबर रोजीच्या २० किमीच्या प्रतिकात्मक पदयात्रेत करत आहोत आणि त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी हुतात्मा दिनाचा कार्यक्रम होईल. त्याला सर्वांनी उपस्थित रहावे.
एका व्हिडिओ संदेशात वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी सांगितले की, ही पदयात्रा यापूर्वी १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार होती, परंतु हवामान परिस्थिती, वाढती थंडी आणि तापलेले राजकीय वातावरण यामुळे ती पुढे ढकलण्यात आली.
वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी अलीकडेच नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे काॅक्रोच जनता पार्टीद्वारे आयोजित निदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी लोकांना २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होण्याचे आणि २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या हुतात्मा दिन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. वांगचुक यांनी हे आवाहन ९ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे लडाखचे नेते आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर केले आहे.
या चर्चेदरम्यान, कलम ३७१ अंतर्गत घटनात्मक संरक्षणासह लडाखसाठी केंद्रशासित प्रदेश स्तरावरील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मंडळाबाबत दोन्ही बाजूंनी चर्चा केली होती. २४ सप्टेंबर २०२५ रोजी लेहमध्ये राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात चार जण ठार झाले आणि ४० हून अधिक जण जखमी झाले.
ही लडाखमधील सर्वात भीषण हिंसाचाराच्या घटनांपैकी एक होती. वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्यावर आंदोलकांचे मुख्य सूत्रधार असल्याचा आणि त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे तरुणांनी हिंसाचार केल्याचा आरोप गृह मंत्रालय व लडाखच्या पोलीस महासंचालकांनी केला होता; त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना जोधपूर कारागृहात ठेवण्यात आले होते.






