मुंबई – अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी मुंबईत झाला होता. सोनालीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली. सोनालीने 1994 मध्ये ‘आग’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनालीसोबत सुपरस्टार गोविंदा होता. मात्र या चित्रपटाला यश मिळाले नाही. आज सोनालीच्या वाढदिवसानिमित्त तिच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.
‘हम साथ साथ हैं’च्या शूटिंगदरम्यान घडला अपघात
1996 मध्ये सोनालीचा ‘दिलजले’ चित्रपट आला होता ज्यामध्ये सोनालीचा अभिनय लोकांना आवडला होता. यानंतर तिने सलमान खानसोबत ‘हम साथ साथ है’मध्ये काम केले. हा चित्रपट चांगला गाजला असता तरी यामुळे सोनाली संकटातही सापडली होती. ‘हम साथ-साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे सोनालीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
1997 मध्ये आलेल्या ‘भाई’ या सुपरहिट चित्रपटात सुनील शेट्टी आणि सोनाली मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही खूप जवळ आले होते, मात्र सेटवरील काही लोकांनाच याची माहिती होती. बघता-बघता सोनालीने सुनीलला लग्नासाठी प्रपोज केले आणि सुनीलने ते मान्य केले. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू झाल्या होत्या मात्रा यांचे लग्न होऊ शकले नाही.
सोनालीचे नाव मनसे नेते राज ठाकरे यांच्याशीही जोडले गेले होते. राज ठाकरे यांचेही सोनालीवर प्रेम होते. जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ही बाब कळाली तेव्हा त्यांनी राज ठाकरेंना सोनालीशी लग्न करण्यास नकार दिला. एके काळी पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब अख्तर तिच्या प्रेमात पडला होता. शोएब अख्तरने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर सोनालीने त्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर तो तिचे अपहरण करेल.
चित्रपट दिग्दर्शक गोल्डी बहलशी केले लग्न
सोनालीने 12 नोव्हेंबर 2002 रोजी चित्रपट दिग्दर्शक गोल्डी बहलशी लग्न केले. सोनाली आणि गोल्डी यांची पहिली भेट 1994 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. सोनालीने आधी गोल्डी बहलचा प्रस्ताव नाकारला पण काही दिवसांनी सोनालीला वाटले की गोल्डी तिची खूप काळजी घेतो. 1998 मध्ये एका पार्टीदरम्यान त्याने सोनालीला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर 4 वर्षे डेटिंग केल्यानंतर यो दोघांनी लग्न केले.
सोनालीला 2018 मध्ये कॅन्सर झाल्याचे निदान झाले. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली. परदेशात उपचार घेतल्यानंतर अभिनेत्री पूर्णपणे निरोगी आहे. ती तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते आणि लोकांना कॅन्सरबद्दल जागरूकही करते.