Pandharpur Accident : दुर्दैवी घटना..! माळशिरस विहीर अपघातातील ८ मृतांची नावे समोर; ६ महिन्याच्या चिमुकल्याचाही अंत
Pandharpur Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे भाविकांची पिकअप गाडी विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातातील ८ मृतांची अधिकृत नावे आता समोर आली आहेत.

Pandharpur Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडलेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन विहिरीत कोसळून 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा महिन्यांच्या चिमुकल्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांची नावे समोर आली आहेत. अपघातात सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Pandharpur Accident)
ही दुर्घटना म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ घडली. पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. (Pandharpur Accident)
मृतांची नावे
इंदुबाई दशरथ बावचे (वय 60)
पूजा अमोल सातोरे (वय 23)
पूजा बालाजी बावचे (वय 27)
अश्विनी संदीप बावचे (वय 27)
संस्कार संदीप बावचे (वय 14)
संस्कृती संदीप बावचे (वय 14)
आरव अमोल सातोरे (वय 8)
समर्थ बालाजी बावचे (वय 6 महिने)
मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. (Pandharpur Accident)
त्रिस्तरीय चौकशीचे आदेश
घटनास्थळी भेट दिल्यानंतर सोलापूरच्या जिल्हाधिकारी एस. कार्तिकी यांनी अपघाताची त्रिस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील रस्त्यालगत असलेल्या सर्व विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांना संरक्षण कठडे उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Pandharpur Accident)





