अधीर रंजन चौधरी यांच्या जागी पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष होणार ‘शुभंकर सरकार’ ; जाणून घ्या त्यांच्या बाबत…

शुभंकर सरकार यांची पश्चिम बंगाल काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने शनिवारी हा निर्णय घेतला. अधीर रंजन चौधरी यांच्या जागी शुभंकर सरकार आता पश्चिम बंगाल काँग्रेसची धुरा सांभाळणार असल्याचे जाहीर केले. सध्या शुभंकर सरकार अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) सचिव पदावर कार्यरत होते.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी अधिकृत अधिसूचनेत सांगितले की, ‘शुभंकर सरकार यांची पश्चिम बंगाल काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना एआयसीसी सचिव पदावरून मुक्त करण्यात आले आहे. त्यांनी PCC अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्या योगदानाचेही कौतुक केले.’
कोण आहेत शुभंकर सरकार ?
शुभंकर सरकार यांचे काँग्रेसशी असलेले नाते फार जुने आहे, तसेच ते पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी वेळोवेळी पक्षात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहे. शुभंकर सरकार यांना 30 ऑगस्ट 2024 रोजी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव बनवण्यात आले. याशिवाय त्यांना तीन राज्यांचे प्रभारीही करण्यात आले होते. 2024 मध्येच त्यांची अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मिझोरामचे राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शुभंकर सरकार यांनी 2013 ते 2018 दरम्यान काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव आणि ओडिशाचे राज्य प्रभारी म्हणूनही काम केले आहे.
राजकीय प्रवास
शुभकर सरकार यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासूनच राजकीय जगात प्रवेश केला. 1993 ते 1996 या काळात ते भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते होते. 1996 ते 2004 पर्यंत ते भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ आणि पश्चिम बंगाल विद्यार्थी परिषदेचे राज्य अध्यक्ष होते. 2004 ते 2006 पर्यंत त्यांनी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहिले.
शुभंकर सरकार यांनी 2007 ते 2009 या काळात पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून काम पाहिले. 2007 ते 2013 पर्यंत त्यांनी पश्चिम बंगाल काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्याची जबाबदारी सांभाळली. 2013 मध्ये त्यांनी पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम केले.
काय म्हणाले शुभंकर सरकार?
शुभंकर सरकार हे 2013 ते 2018 या काळात काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिवही होते. 2024 मध्ये, जिथे शुभंकर सरकार काँग्रेस कमिटीमध्ये राष्ट्रीय सचिव आणि अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मिझोरामचे राज्य प्रभारी म्हणून काम करत होते. त्याचवेळी पक्षाने आता त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत अधीर रंजन चौधरी यांच्या जागी त्यांना पश्चिम बंगालच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
पश्चिम बंगाल काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभंकर सरकार म्हणाले की, काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार काम करेल, जनतेच्या आकांक्षाच पक्षाची भावी दिशा ठरवेल.
सीएम ममता यांच्याशी कसे संबंध ठेवावेत
अधीर रंजन चौधरी हे बंगालमधील राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी टीएमसी आणि काँग्रेस यांच्यातील युतीलाही विरोध केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही यासंदर्भात अधीर रंजन चौधरी यांना फटकारले होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून अधीर रंजन चौधरी यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली जाणार असल्याची चर्चा होती. जे बरोबर असल्याचे सिद्ध झाले. एकीकडे अधीर रंजन चौधरी हे टीएमसी-काँग्रेस आघाडीच्या विरोधात होते. दुसरीकडे शुभंकर सरकार या युतीच्या बाजूने होते.
=================





