Shri Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana: सभासदांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार; श्री छत्रपती बचाव पॅनलचा इशारा
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana) नवीन संचालक मंडळाने २५ मे २०२५ रोजी कारभार स्वीकारल्यानंतर सुमारे सव्वा वर्ष उलटूनही सभासदांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोप श्री छत्रपती बचाव पॅनलच्या वतीने करण्यात आला आहे.

Shri Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana) नवीन संचालक मंडळाने २५ मे २०२५ रोजी कारभार स्वीकारल्यानंतर सुमारे सव्वा वर्ष उलटूनही सभासदांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोप श्री छत्रपती बचाव पॅनलच्या वतीने करण्यात आला आहे.
निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने देऊन सत्ता मिळवली; मात्र त्यांची पूर्तता करण्यात विद्यमान संचालक मंडळाला अपयश आल्याचा दावा पॅनलने केला आहे. पॅनलने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्तेवर येण्यापूर्वी कारखान्यात (Shri Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
तसेच सुमारे ३,५०० साखरेची पोती कमी असल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, सत्तेवर आल्यानंतर या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. जर साखरेची पोती खरोखरच कमी होती, तर त्याबाबत जबाबदारांवर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
याशिवाय, २०२४-२५ हंगामात १३ लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट गाठता आले नाही. तसेच सभासदांना उसाच्या कांड्यांचे बिल देण्याचे आश्वासनही पूर्ण करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात विरोधासाठी विरोध न करता संचालक मंडळाला (Shri Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana) काम करण्याची संधी दिली. मात्र सभासदांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आता शांत बसणार नसल्याचा इशारा श्री छत्रपती बचाव पॅनलने दिला आहे. सभासदांना न्याय मिळाला नाही, ऊस उत्पादकांच्या मागण्या प्रलंबित राहिल्या आणि दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कारखाना हा कोणत्याही एका गटाचा किंवा व्यक्तीचा नसून हजारो सभासदांचा आहे. सभासदांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. अपूर्ण राहिलेल्या प्रत्येक आश्वासनाचा जाब विचारला जाईल आणि सभासदांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू राहील, असा निर्धार पॅनलने व्यक्त केला आहे.
दरम्यान, कारखान्याचे काही कामगार तसेच शिक्षण संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक अडचणींमुळे इतर कारखान्यांकडे ऊस दिल्याच्या कारणावरून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचा आणि सेवेतून कमी करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही श्री छत्रपती बचाव पॅनलने केला आहे. अशा पद्धतीने दबाव टाकून गाळप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.






