Karad News : दोन दिवस कुणालाच सांगितलं नाही अन्…; विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, मृत्यूनंतर धक्कादायक माहिती समोर
Karad News : अशातच सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Karad News : नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे उभारण्यात आलेले कॅाक्रोच जनता पार्टाचे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर संपवण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणाने आंदोलनाने मोठं रुप घेतलं होतं. केंद्र सरकारवर असंतोष वाढत चालला होता. अखेर प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन संपवण्यात आल्याची घोषणा केली. ( Karad News)
या आंदोलनातून कॅाक्रोच जनता पार्टीच्यावतीने काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे नीटमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक साह्य ही देखील प्रमुख मागणी होती. याबाबत केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून अट मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. तशी पाऊल देखील केंद्र सरकारकडून उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशातच सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ( Karad News)
विषारी औषध केलं प्राशन (Karad News)
वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) अपयश आल्याने खचलेल्या एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलतं आपलं जीवन संपवलं आहे. ही दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घडली आहे. समीक्षा दीपक पवार (वय १८) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव असून, ती शेरे गावची रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेत समीक्षाला अपेक्षित गुण मिळाले नाहीत. यामुळे ती तणावत गेले होती. हा तणाव असह्य झाल्याने २३ जुलै रोजी तिने घरात असलेलं उंदीर मारण्याचं विषारी औषध प्राशन केलं.
सुरुवातीला समीक्षाने ही घटना कुटुंबीयांपासून लपवून ठेवली. मात्र, विषारी औषधाचे सेवन केल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा गंभीर परिणाम तिच्या शरीरावर दिसून येऊ लागला. तिला असह्य पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर वेदना सहन न झाल्याने अखेर तिने संपूर्ण घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. २६ जुलै रोजी तिला कुटुंबीयाने तातडीने कराड येथील एका रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत तिच्या शरीरावर विषाचा भयंकर परिणाम झाला होता आणि अखेर तिचा सोमवारी मृत्यू झाला.
अखेर सोमवारी मृत्यू (Karad News)
समीक्षाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर डॅाक्टरांनी शर्थीचे उपचार केले. मात्र, त्यांना यश आले नाही. अखेर सोमवारी(२७ जुलै) तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेरे गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्कित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Satara News : मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा ८० टीएमसी पार! उद्यापासून विसर्ग सुरु





