Union Budget 2025 : अर्थसंकल्प सादरीकरणावेळी ती १५ मनिटं लक्षवेधी ठरली; विरोधकांकडून घोषणाबाजी अन्…; नेमकं काय घडलं त्यावेळेत?

नवी दिल्लीः देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी एनडीए सरकारचा आठवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांसाठी अतिशय महत्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केलेल्या यामुळे करदात्यांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. एकीकडे २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला जातो होता. तर दुसरीकडे यावेळीत बरच काही घडल होतं.
लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर बसलेले सदस्य उपस्थित होते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे सभागृहात आल्यानंतर अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला अर्थमंत्र्यांनी सुरूवात केली. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार त्यापूर्वीच लोकसभेत विरोधकांकडून गदारोळ घालण्यात आला. विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. यामुळे काही वेळ विरोधकांना शांत करण्याासाठी अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सूचित केले. मात्र, विरोधक शांत होत नव्हते. अखेर अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या सादरीकणाला सुरूवात केली.
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात करताच विरोधक काही वेळानंतर शांत झाले. राहुल गांधी यावेळी आपल्या आसनावर शांत बसून होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. सर्वात महत्वाची घोषणा १२ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स यापुढे आकारला जाणार नसल्याची महत्वाची घोषणा सितारमण यांनी केली. यावेळी सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी घोषणा द्यायला सुरूवात केली. मोदी….मोदी… तसेच यावेळी मोदींनीही त्यांच्या डेस्कवर जोराने हात मारला. या नव्या घोषणांमुळे सर्वसामान्यांपासून अनेकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
या आहेत काही महत्वाच्याघोषणा
डाळींमध्ये ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणा
जलजीवन मिशन योजनेला 2028 पर्यंत मुदतवाढ
शहरी भागातल्या विकासासाठी स्वातंत्र्य निधी
वैद्यकीय शिक्षणाच्या 75 हजार जागा वाढवणार
शाश्वत शहरांसाठी 5000 हजार कोटी रुपयांची तरतूद
वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार वाढण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या 1 लाख 10 हजार जागा वाढवल्या जाणार तर पुढच्या पाच वर्षात 75 हजार जागा वाढवणार





