‘आरएसएस-भाजपाला संविधान नको, मनुस्मृती हवीय…’ ; राहुल गांधींसाठी धावून आले शशी थरूर ; काय म्हणाले जाणून घ्या?

Shashi Tharoor on Rahul Gandhi। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी,”भाजप-आरएसएसला संविधानाऐवजी मनुस्मृती हवी आहे” असे म्हणत जोरदार टीका केली. दरम्यान, भाजपने राहुल गांधींच्या या विधानावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या मदतीला आता काँग्रेसचे नेते शशी थरूर धावून आले आहेत. याविषयी बोलताना थरूर यांनी, “रायबरेलीचे खासदार असे म्हणाले कारण संविधान स्वीकारण्याच्या वेळी त्यावर टीका झाली होती”
पुढे बोलताना शशी थरूर यांनी, ‘ऐतिहासिकदृष्ट्या ते (राहुल गांधी) हे सांगत आहेत की संविधान स्वीकारण्याच्या वेळी ही टीका व्यक्त केली गेली होती. त्यावेळी संघ प्रमुख गोळवलकर यांनी इतरांसह असे म्हटले होते की संविधानातील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे त्यात मनुस्मृतीपासून काहीही नाही.’ असे त्यांनी म्हटले.
‘त्या’ काळापासून आरएसएस पुढे गेला Shashi Tharoor on Rahul Gandhi।
तिरुवनंतपुरमचे खासदार म्हणाले, ‘मात्र, मला वाटते की आरएसएस स्वतः त्या काळापासून पुढे गेला आहे. म्हणून, ऐतिहासिक विधान म्हणून ते अचूक आहे, ते आज त्यांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे की नाही. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आरएसएस सर्वोत्तम स्थितीत असावा.’
RSS का नक़ाब फिर से उतर गया।
संविधान इन्हें चुभता है क्योंकि वो समानता, धर्मनिरपेक्षता और न्याय की बात करता है।
RSS-BJP को संविधान नहीं, मनुस्मृति चाहिए। ये बहुजनों और ग़रीबों से उनके अधिकार छीनकर उन्हें दोबारा ग़ुलाम बनाना चाहते हैं। संविधान जैसा ताक़तवर हथियार उनसे छीनना इनका…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 27, 2025
राहुल गांधी काय म्हणाले? Shashi Tharoor on Rahul Gandhi।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरएसएसचे सह-सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती की, ‘आरएसएसचा मुखवटा पुन्हा उतरला आहे. संविधान त्यांना दुखावते कारण ते समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्यायाबद्दल बोलते. आरएसएस-भाजपाला संविधान नको आहे, त्यांना मनुस्मृती हवी आहे. ते बहुजन आणि गरीब लोकांना त्यांचे हक्क हिसकावून पुन्हा गुलाम बनवू इच्छितात. त्यांचा खरा अजेंडा त्यांच्याकडून संविधानासारखे शक्तिशाली शस्त्र हिसकावून घेणे आहे. आरएसएसने स्वप्न पाहणे थांबवावे – आम्ही त्यांना कधीही यशस्वी होऊ देणार नाही. प्रत्येक देशभक्त भारतीय शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल.’असे त्यांनी म्हटले आहे.





