Sharad Pawar : विलीनीकरणाच्या त्या चर्चेत जे नेते प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, त्यांना त्या बैठकीत काय घडले याची माहिती कशी असणार?, असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक प्रतिसवाल केला. शरद पवारांचे (Sharad Pawar) हे विधान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पक्षातील त्या नेत्यांना एक प्रकारचे आव्हान मानले जात आहे, जे विलीनीकरणाची चर्चा झालीच नसल्याचे वारंवार सांगत आहेत. या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबतच्या चर्चेला आता नवीन वळण मिळाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना थेट शब्दांत प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या पुनर्मिलनावरून राजकारणात मोठे वादंग सुरू आहे. शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांच्या दाव्यानुसार, १७ जानेवारी रोजी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीला स्वतः शरद पवार आणि अजित पवार उपस्थित होते, असे सांगितले जाते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा पूर्णतः फेटाळून लावला. अजित पवार माझ्याशी सर्व महत्त्वाच्या गोष्टी सामायिक करत असत. जर विलीनीकरणासारखा मोठा निर्णय झाला असता, तर त्यांनी मला निश्चितपणे कल्पना दिली असती, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, एककीकडे राज्यात विलीनीकरणाच्या चर्चांचे वादळ घोंगावत असताना, शरद पवार मंगळवारी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात ते सहभागी होतील. Devendra Fadanvis दोन दिवस दिल्लीत संसदीय जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ते पुन्हा बारामतीला परतणार आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात आणि त्यानंतरच्या बारामती वास्तव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत काही ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय आता शरद पवार नाही तर ‘ही’ व्यक्ती घेणार