School Timing Change : मोठी बातमी..! शाळांच्या वेळात बदल; पाऊस लांबल्याने प्रशासनाचा निर्णय
School Timing Change : राज्यात मान्सूनचे आगमन अद्याप लांबल्याने उष्णतेचा आणि दमट हवामानाचा कहर कायम आहे. या वाढत्या उकाड्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षा राखली जावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

School Timing Change : राज्यात मान्सूनचे आगमन अद्याप लांबल्याने उष्णतेचा कहर कायम आहे. रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 19 जून ते 30 जून 2026 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. (School Timing Change)
उष्णतेमुळे शाळांच्या वेळांमध्ये बदल
रायगड जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झालेला नसून, उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या उकाड्याचा त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (School Timing Change)
आदेशानुसार, 19 जून ते 30 जूनदरम्यान सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रातच सुरू राहतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (School Timing Change)
हवामान विभागाचा यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी उष्ण आणि दमट हवामानासह दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच गडगडाटाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला. (School Timing Change)
रत्नागिरीत पाणी वापरावर निर्बंध (School Timing Change)
दरम्यान, पाऊस लांबल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट, हॉटेल आणि जलतरण तलावांसाठी पाण्याचा वापर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शहरासाठी केवळ सुमारे 25 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (School Timing Change)
पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत
मान्सून उशिरा दाखल होत असल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी मका, तूर, मूग, बाजरीसह विविध पिकांचे बियाणे आणि खते आधीच खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, पुरेसा पाऊस नसल्याने पेरणी सुरू करता आलेली नाही. (School Timing Change)
याचा परिणाम ग्रामीण बाजारपेठांवरही झाला असून, कृषी सेवा केंद्रांमध्ये दरवर्षी दिसणारी शेतकऱ्यांची गर्दी यंदा दिसत नसल्याचे चित्र आहे. मान्सून लवकर सक्रिय होण्याकडे आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. (School Timing Change)






