“तामिळनाडूत अम्मा जयललितांचे राज्य मी पुन्हा आणेल…” ; राजकारणातील एन्ट्रीची शशिकला यांची मोठी घोषणा

Sasikala’s entry into politics। तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजवत अण्णा द्रमुकच्या माजी नेत्या व्ही.के. शशिकला यांनी त्यांच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. शशिकला यांनी स्पष्टपणे सांगत त्या पक्षाला पुनरुज्जीवित करणार असून माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे शासन मॉडेल पुन्हा एकदा तयार करणार असल्याचे त्यांनी म्हटले. “त्यांच्याकडे अनुभव आणि समज आहे, ज्यामुळे हे ध्येय साध्य करता येईल” असा दावा शशिकला यांनी यावेळी केला .
‘मी पुन्हा अम्मांचे राज्य परत आणेन’
पक्षाच्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलताना शशिकला,”आतापर्यंत परिस्थिती तशीच आहे आणि ती बदलणे माझे काम आहे. ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या केवळ अनुभवी व्यक्तीच दूर करू शकते. अनेकांना वाटते की ते राजकारणात येऊन सर्व काही करतील, परंतु राजकारण वेगळे आहे. जे योग्यरित्या काम करू शकतात तेच यशस्वी होऊ शकतात. मी निश्चितच अम्मांचे राज्य परत आणेन. जर माझ्यात आत्मविश्वास नसता तर मी ते म्हटले नसते. कितीही अडचणी आल्या तरी आपण ते साध्य करू.” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सध्याच्या नेतृत्वावर हल्ला
शशिकला यांनी पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वावरही निशाणा साधत,”अंतर्गत संघर्ष आणि समस्यांसाठी तेच जबाबदार आहेत. पक्षाची सखोल समज आणि वर्षानुवर्षे अनुभव असलेले नेतेच अण्णाद्रमुकचे संकट सोडवू शकतात” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
द्रमुक सरकारवर थेट हल्ला Sasikala’s entry into politics।
तामिळनाडूच्या सध्याच्या राजकारणावर बोलताना शशिकला यांनी द्रमुक सरकारला अडचणीत आणले. त्यांनी सांगितले की, “यावेळी लोकांना हुशारीने मतदान करावे लागेल. अम्मा जयललिता तामिळनाडूला चांगले बनवत होत्या, पण आता परिस्थिती वेगळी आहे. मी शांत झोपूही शकत नाही. जेव्हा आम्ही राज्य करत होतो तेव्हा आम्हाला या राज्याची जबाबदारी माहित होती. आता जे घडत आहे ते वेदनादायक आहे. मी एमके स्टॅलिनला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही. तुम्ही (स्टॅलिन) आता सरकार स्थापन करू शकणार नाही. ”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “अण्णाद्रमुक सरकारच्या काळात सफाई कामगारांचे खाजगीकरण झाले हे खरे आहे, परंतु जयललिता जिवंत असेपर्यंत आम्ही असे कोणतेही पाऊल उचलले नाही.”
पुनरागमनाचे स्पष्ट संकेत Sasikala’s entry into politics।
शशिकला यांच्या या विधानांवरून हे स्पष्ट झाले आहे की त्यांनी पुन्हा तामिळनाडूच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णाद्रमुकमध्ये पुन्हा प्रभाव मिळवणे आणि जयललिता यांचा राजकीय वारसा पुन्हा मजबूत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.





