‘प्रचंड बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावर निर्णय नाही…हा सगळा दिल्लीचा खेळ’ ; संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

Sanjay Raut on mahayuti। महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम राहिल्याने सर्वच गोष्टी रखडल्या असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे नेते महायुतीवर निशाणा साधत आहेत. यामध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा न झाल्याने महायुतीवर ताशेरे ओढले आहेत.तसेच राज्यातील सर्व खेळ हे केंद्रातून चालतात असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी,”एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, ते कसे गायब आहेत? त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे, तरीही ते त्यांचे नाव जाहीर करू शकत नाहीत. हा सगळा दिल्लीचा खेळ आहे. महाराष्ट्रात एक अद्भुत लीला चालू आहे, लोक दिल्लीत बसून ढोल वाजवत आहेत.” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली.
शेतकऱ्यांना चित्रपट बघायला वेळ नाही Sanjay Raut on mahayuti।
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही साबरमती रिपोर्ट चित्रपट पाहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खरडपट्टी काढली. साबरमती चित्रपटासाठी पंतप्रधानांकडे वेळ आहे पण अदानी फाईलवर चर्चा करायला वेळ नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांबद्दल बोलायला वेळ नाही.
‘मणिपूर फाईलवरही चित्रपट बनवा’ Sanjay Raut on mahayuti।
ते पुढे म्हणाले की, आम्ही चित्रपटांनाही सूचना देऊ शकतो. काश्मीर फाईल, साबरमती फाईल, अनेक फाईल्स, सर्व उघडतील. त्याने आपल्या कुटुंबातील निर्मात्यांना मणिपूर फाईल नावाचा चित्रपट बनवण्यास सांगितले. तेही महत्त्वाचे आहे.
हेही वाचा
श्रुती मराठेची बॉलीवूडमध्ये एन्ट्री; नाना पाटेकरांसोबत शेअर करणार स्क्रीन





