Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत केलेल्या दाव्याने राज्यभरात चर्चा सुरू असतानाच, आता चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील (Sanjay Raut) यांनी संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. यासोबतच त्यांनी राऊत यांच्यावर तीव्र टीकाही केली आहे. संजय राऊत यांनी नुकतेच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पाचोरा-पारोळाचे आमदार यांच्याबाबत विधान केले होते. त्यांनी असा दावा केला होता की, पुढील विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. राऊत यांनी यावर पुष्टी देताना सांगितले होते की, हे दोन्ही आमदार गिरीश महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय आहेत, त्यामुळे ही माहिती त्यांना खात्रीने मिळालेली आहे. Sanjay Raut या विधानाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, शिवसेना पक्षाचे जे तुकडे झाले आहेत, ते संजय राऊत यांच्यामुळेच झाले आहेत. एकसंघ शिवसेनेचे तुकडे करण्यास संजय राऊत हेच मुख्य कारणीभूत आहेत. त्यांनी राऊत यांना ‘मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणारे’ असेही म्हटले. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, संजय राऊत जळगावमध्ये लग्न समारंभाला येतात आणि तेथे राजकीय गप्पा मारतात. आम्ही शिवसेनेत किती निष्ठावंत आहोत, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठा दावा करताना सांगितले की, संजय राऊत हे ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत आहेत. ते शिवसेनेचा ठाकरे गट फोडून एक नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे गटात राऊत मोठा उठाव करणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांना सोडण्याचा कोणताही विचार आपण करू शकत नाही, असे स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, “जेव्हा आम्ही असं कुठलंही काम करू, तेव्हा थेट घरी बसू.” या संपूर्ण प्रकरणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेला हा दावा संजय राऊतांना डिवचण्यासाठी केलेला आहे का, असा प्रश्नही अनेकजण उपस्थित करत आहेत. एकीकडे संजय राऊत (Sanjay Raut) यांचा भाजपाकडे जाण्याचा दावा आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे गट फुटण्याचा दावा, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही नेत्यांमधील हे आरोप-प्रत्यारोप सध्या चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहेत आणि याचे पडसाद राज्याच्या राजकीय क्षेत्रात उमटत आहेत.