‘बिहार निवडणुकीपूर्वी दर महिन्याला १२ लाख लोकांना नोकऱ्या मिळणार’ ; उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा दावा

Samrat Chaudhary। बिहारमधील वैशाली याठिकाणी आयोजित वैशाली महोत्सवाचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी,”डबल इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये जलद विकास होत आहे तसेच २००५ ते २०२० पर्यंत राज्यात पाच लाखांहून अधिक लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी, नितीश सरकार दरमहा १२ लाख लोकांना नोकऱ्या आणि ३८ लाख लोकांना रोजगार देण्याच्या लक्ष्यावर काम करत असल्याचा मोठा दावा केला आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बिहार सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच वैशालीसारख्या पवित्र स्थळांना जागतिक मान्यता देण्यासाठी काम करत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘वैशालीची भूमी पवित्र ‘ Samrat Chaudhary।
पर्यटन मंत्री राजू कुमार सिंह यांनी “वैशाली महोत्सवाला गौरवशाली म्हटले. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे ही भाग्याची गोष्ट आहे” असे ते म्हणाले. “वैशालीची भूमी पवित्र आहे, जिथे महावीर तीनदा आले आणि गौतम बुद्धांनीही पाऊल ठेवले. वैशालीच्या विश्वशांती स्तूपाची संपूर्ण देशात एक विशेष ओळख आहे. या सणाचा सर्वांना अभिमान आहे.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वैशालीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार Samrat Chaudhary।
मंत्र्यांनी वैशालीच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या कामांचा उल्लेख केला. त्यांनी यावेळी,”वैशालीच्या पुष्करणीच्या विकासासाठी २९ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. तसेच, वैशालीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील” असे आश्वासन त्यांनी दिले. वैशाली महोत्सवात स्थानिक लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमामुळे वैशालीचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढे आला.
महोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांनीही लोकांचे लक्ष वेधून घेतले. स्थानिक लोकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि असे म्हटले की यामुळे वैशालीचे वैभव आणखी वाढेल. या महोत्सवाचे केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व नाही तर या प्रदेशातील पर्यटनाला चालना देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल.





