“आधी दुर्लक्ष करतील, मग टिंगल करतील आणि मग…”गांधीजींच्या वाक्याचा उल्लेख करत संभाजीराजेंचे पवारांना प्रत्युत्तर

Sambhaji Raje on Sharad Pawar । राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षात राजकीय घडामोडींचा वेग आला आहे . त्यातच सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी पक्ष एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. तर राज्यात आता तिसऱ्या आघाडीचीही निर्मिती झाली आहे. याच तिसऱ्या आघाडीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मिश्किल टिपण्णी केली होती. त्यांच्या याच टिपण्णीला आज संभाजीराजे छत्रपती यांनी उत्तर दिले आहे.
संभाजीराजे यांचे शरद पवारांना उत्तर Sambhaji Raje on Sharad Pawar ।
आज संविधान पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजीराजे बोलत होते. शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीवर केलेल्या टिपण्णील उत्तर देताना संभाजीराजे यांनीराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वाक्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी यावेळी, “महात्मा गांधी कायम म्हणायचे आधी दुर्लक्ष करतील, मग टिंगल करतील आणि मग ते लढतील नंतर तुम्ही जिंकाल.” हे महात्मा गांधींचं प्रसिद्ध वाक्य सांगत पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. एवढे नाही तर शरद पवार हे ज्येष्ठ आहेत आणि त्यांना टिंगल करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलताना संभाजी राजे यांनी ” शरद पवार हे ज्येष्ठ आहेत त्यांना आरक्षणाबाबत जास्त समजत असेल, पण मराठा समाज्याला obc मधून आरक्षण हवं आहे, मराठा सामाज्यात अस्वस्था निर्माण झालीय., असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जातीय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.
महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती आघाडी Sambhaji Raje on Sharad Pawar ।
दरम्यान, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी आकाराला येत आहे. त्यासाठी पुण्यात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आ. बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे यांच्या उपस्थितीत ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीची घोषणा झाली आहे. ही आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी ही आघाडी तयार करण्यात आली आहे.
सध्या ज्याप्रकारचे राजकारण सुरू आहे, त्याला राज्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळेच आम्ही सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वास आहे की, मतदार आम्हाला साथ देतील आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मदत करतील. तिसऱ्या आघाडीच्या जागा वाटपाबाबत आम्ही सर्व नेते बसून निश्चित चर्चा करू. संपूर्ण 288 जागांवर उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.





