Trupti Desai : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सख्यी बहिण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल आठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी 28 दिवसांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आपली बाजू मांडत खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच, हा माझा दृढ विश्वास आहे, असे म्हटले आहे. आता यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर घणाघाती टीका करत काही सवाल उपस्थित केले आहेत. तृप्ती देसाईंचे सवाल (Trupti Desai) गेले 28 दिवस रूपाली चाकणकर झोपल्या होत्या का? आता त्यांना जाग कशी आली? जर त्यांची प्रतिमा मलीन झाली असेल, तर त्यांनी समोर येऊन खुलासा करणे गरजेचे होते. इतके दिवस त्या गायब का होत्या? असे सवाल उपस्थित केले आहे. Trupti Desai प्रतिभा चाकणकरांवर आरोप तसेच या प्रकरणावरुन तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रूपाली चाकणकर, त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अशोक खरातचे भक्त होते. प्रतिभा चाकणकर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असून, खरातला विलन ठरवून स्वतःला हिरो दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. या प्रकरणात प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून संबंधित राजकारण्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोपही तृप्ती देसाई यांनी केला आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर करत वरिष्ठ पोलिस अधिकारी दत्ता कराळे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कराळे यांनी खरातला 18 कॉल केल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली आहे. कराळेंच्या चौकशीची मागणी यावर तृप्ती देसाई म्हणाल्या आयजी दत्ता कराळे यांचा कार्यकाळ केवळ दोन महिन्यांचा उरला आहे. त्यांनी अशोक खरातला पाठीशी घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे दत्ता कराळेंची तातडीने चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. Trupti Desai हेही वाचा : Migraine: मायग्रेन वाढवणाऱ्या चुका टाळा! तज्ञ सांगतात ‘हे’ सोपे उपाय