“पाकिस्तानच्या मानगुटीवर द्विराष्ट्र सिद्धांताचे भूत” ; मोहन भागवतांनी पाकला म्हटले ‘दुट्टप्पी देश’

RSS chief Mohan Bhagwat। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये आयोजित कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप समारंभात राजकीय विधान करत पाकिस्तानला दुटप्पी देश म्हटले. द्विराष्ट्र सिद्धांताच्या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “ही कल्पना अजूनही पाकिस्तानला भुतासारखी सतावत आहे” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.
मोहन भागवत यांनी यावेळी, “पाकिस्तानच्या मनात द्विराष्ट्र सिद्धांताचे भूत आहे. शांततेत राहता यावे म्हणून ते वेगळे झाले आणि वेगळे होताच त्यांनी अशांतता निर्माण करण्यास सुरुवात केली. जोपर्यंत हा दुटप्पीपणा दूर होत नाही, तोपर्यंत देशात धोके कायम राहतील. “असे म्हटले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या बातमीमुळे देशात संताप आहे अशा वेळी हे विधान आले आहे. भागवत हे निदर्शनास आणून देत होते की पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देऊन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करतो.
धर्मांतरावर कडक भूमिका RSS chief Mohan Bhagwat।
आदिवासी नेते अरविंद नेताम यांनी कार्यक्रमात आदिवासी भागात धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, मोहन भागवत यांनी त्याला हिंसाचार म्हटले. ते म्हणाले की, “जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने आपली उपासना पद्धत बदलली तर काही हरकत नाही, परंतु लोभ किंवा दबावाखाली धर्म बदलणे ही हिंसा आहे.” असे म्हटले. ते म्हणाले की,”धर्मांतर ही हिंसा आहे. ज्यांना त्यांच्या मूळ धर्मात परत यायचे आहे त्यांना परत आणले पाहिजे. आरएसएस बऱ्याच काळापासून घर वापसी मोहिमेच्या बाजूने आहे आणि या विधानाकडे त्याच विचारसरणीचे पुनरुज्जीवन म्हणून पाहिले जात आहे.
आदिवासी भागात धर्मांतर RSS chief Mohan Bhagwat।
कार्यक्रमात आदिवासी नेते नेताम यांनी आदिवासी भागात नियोजनबद्ध पद्धतीने धर्मांतर होत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. मोहन भागवत यांनी याला पाठिंबा दर्शवला आणि म्हणाले: जर एखाद्या व्यक्तीने जबरदस्ती किंवा फसवणुकीमुळे आपला धर्म बदलला तर त्याला त्याच्या मूळ धर्मात परतण्याचा अधिकार असला पाहिजे. समाजाने अशा लोकांना बहिष्कृत न करता त्यांना पाठिंबा द्यावा.





