“इकडे लोक मरत होते अन् तिकडे…” ; सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्या सेल्फीवरून भाजपचा हल्लाबोल

RCB Victory Parade Stampede। बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या विजयी परेडपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून राजकीय गोंधळ तीव्र झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू आणि डझनभर जखमी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांनी आता कर्नाटक सरकारला घेरले आहे. भाजपने या घटनेचे वर्णन “सरकारच्या अपयशाचे” आणि “राजकीय लोभाचे” परिणाम म्हणून केले आहे.
भाजपने जारी केलेल्या निवेदनात, “ही केवळ चेंगराचेंगरी नव्हती तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील अंतर्गत कलहामुळे निर्माण झालेली सरकारनिर्मित शोकांतिका होती.”
राहुल गांधींवरही निशाणा साधला RCB Victory Parade Stampede।
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही काँग्रेस नेते राहुल गांधींवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “राहुल गांधी दररोज सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवतात. पण अपघातात इतके लोक मरण पावले तेव्हा राहुल कुठे आहेत?” भाजपने राहुल गांधींकडे मागणी केली की त्यांनी या अपघातावर तात्काळ कारवाई करावी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना दिल्लीला बोलावून घ्यावे.
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”
या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे भाजप प्रवक्त्यांनी म्हटले आहे. तसेच, डीके शिवकुमार यांनी जनतेची माफी मागावी.
#WATCH | On the Bengaluru stampede, BJP MP Sambit Patra says, “BCCI President and IPL Chairman said they were unaware of any such event. Victory marches have been carried out previously as well… But the victory parades were always held at least 2 days after victory… This time… pic.twitter.com/r0Ae9Utlji
— ANI (@ANI) June 5, 2025
“तीन लाख लोक तिथे कसे पोहोचले?” RCB Victory Parade Stampede।
या घटनेवर प्रश्न उपस्थित करत भाजपने विचारले की, “३,००,००० लोक तिथे कसे पोहोचले? त्यांना परवानगी देण्यात आली का? जेव्हा पोलिसांनी परवानगी दिली नाही, तेव्हा ही विजयी यात्रा कशी झाली?”
“लोक मरत होते, आणि उत्सव चालू होता”
घटनेतील निष्काळजीपणाबद्दल भाजपने म्हटले आहे की, “जेव्हा लोक मरत होते, तेव्हा तिथे आनंदोत्सव सुरू होता. आजही रुग्णालयात ५० लोक जखमी आहेत. हे लज्जास्पद आहे.”
आयपीएल अध्यक्षांनाही अडचणीत आणले
भाजपने म्हटले आहे की आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल स्वतः म्हणत आहेत की त्यांना या कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती नव्हती. यावरून असे दिसून येते की कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गैरव्यवस्थापन झाले होते.
“अल्लू अर्जुनला अटक झाली, मग इथे का नाही?”
भाजपने असा प्रश्न उपस्थित केला की जेव्हा अभिनेता अल्लू अर्जुनला जुन्या चेंगराचेंगरी प्रकरणात अटक करण्यात आली होती, तर मग या प्रकरणात डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये?
तिकिटांच्या काळाबाजाराचेही आरोप
या कार्यक्रमासाठी २५,००० अतिरिक्त तिकिटे विकण्यात आल्याचा आरोपही भाजपने केला आहे, ज्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि ही दुर्घटना घडली. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी भाजपची मागणी आहे.





