राष्ट्रवादीचा पलटवार; शरीफ यांच्या घरी बिर्याणी कोणी खाल्ली?
मुंबई : पाकिस्तानचे शासक शरद पवार यांना नव्हे तर पंतप्रदान मोदी यांनाच चांगले वाटतात. म्हणून ते शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेले होते, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. पवारांवरील आरोप मोदी यांनी सिध्द केले तर आम्ही राजकारण सोडून देऊ अन्यथा मोदी यांनी खोटे बोलल्याबद्दल जनतेची माफी मागावी असे खुले आव्हानही मलिक यांनी दिले.
https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/2491686294436266/
नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधानांनी शरद पवार यांना पाकिस्तानातील शासक चांगले वाटतात. त्याचा खेद वाटतो, असे विधान केले. त्यावर राष्ट्रवादीने तातडीने प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पवार यांचे विधान तपासा. ते म्हणाले होते, पाकिस्तानातील जनता चांगली आहे. पण तेथील राज्यकर्त्यांचे धोरण भारतविरोधी आहे. तेथील राज्यकर्ते त्या देशाला युध्दखोरीकडे ढकलतात. मोदी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र, त्याच्या पदाला असे खोटे बोलणे शोभत नाही. त्यांनी हे विधान सिध्द करावे किंवा जनतेची माफी मागावी