पुणे – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने बलाढ्य दिल्ली संघाचा 9 गडी राखून सहज पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा पहिला डाव 191 धावांवर संपवला होता व आपल्या पहिल्या डावात 324 धावा करत मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर दिल्लीनेही दुसऱ्या डावात जिद्दी फलंदाजी करत कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंमत सिंग 84 धावांवर बाद झाला व त्यांच्या अन्य फलंदाजांनी हाराकिरी पत्करली व त्यांचा डाव 310 धावांवर संपुष्टात आला.
#BANvsIND । शुबमन, पुजाराचा शतकीय धमाका; बांगलादेशासमोर बलाढ्य लक्ष्य
हिंमत सिंगच्या आधी यश धौल 57, वैभव रावल 55, नीतिश राणा 40, ललित यादव 26 यांनी थोडी चमक दाखवली होती. तरीही ते महाराष्ट्रासमोर विजयासाठी 178 धावांचेच आव्हान उभे करू शकले. हे आव्हान महाराष्ट्राने 45.4 षटकांत 1 बाद 180 धावा करत पूर्ण केले व या विजयासह स्पर्धेत विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात सलामीवीर सिद्धेश वीर 18 धावांवर बाद झाला.
#BANvsIND । शुबमन, पुजाराचा शतकीय धमाका; बांगलादेशासमोर बलाढ्य लक्ष्य
त्यानंतर मात्र पवन शहा व कौशल तांबे यांनी दुसऱ्या गड्यासाठी 140 धावांची भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला. पवनने 132 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 87 धावांची खेळी केली. त्याला तोलामोलाची साथ देताना कौशलने नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 115 चेंडूत 7 चौकार फटकावले.
Maharashtra Won by 9 Wicket(s) #MAHvDEL #RanjiTrophy Scorecard:https://t.co/5mdHsGB4tN
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 16, 2022