Ramdas Kadam on Uddhav Thackeray । राज्यात मागच्या दोन अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सरावात मोठ्या बंडाविषयी म्हणजेच शिवसेनेतील बंडाविषयी मोठा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. हा दावा दुसरं-तिसरं कोणी नाही तर ठाकरेंची साथ सोडणारे कट्टर शिवसैनिक आणि सध्या शिंदे गटात सहभागी झालेले नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्यांनी सेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला होता ज्यामुळे गेलेले सर्व आमदार परत आले असते मात्र ठाकरेंनी माझं काही ऐकलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय. पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे ऐकले Ramdas Kadam on Uddhav Thackeray । याविषयी बोलताना रामदास कदम यांनी,”एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला होता. तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असे सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे ऐकले आणि ते काँग्रेससोबत राहिले, असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले. ते शुक्रवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. गद्दारीची व्याख्या काय आहे, हे अनेकांना अद्याप कळलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली. शिवसेनचे आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटले की, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये सगळे आमदार परत आणतो. पण उद्धव ठाकरे यांनी माझे ऐकले नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले. शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी भाजपवर आगपाखड केली होती. मात्र, या कार्यक्रमात त्यांचा भाजपबाबतचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसला. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे. जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचं आहे. आमचं एकच ध्येय आहे. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला विकास करायचा आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले. योगेश कदमांसमोर चुलत भावाचे आव्हान? Ramdas Kadam on Uddhav Thackeray । आगामी विधानसभा निवडणुकीत रामदास कदम याचे पुत्र योगेश कदम यांच्यासमोर दापोली मतदारसंघात नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत सख्खा चुलत भाऊच योगेश कदम यांच्या विरोधात काम करेल, अशी शक्यता आहे. उद्योजक सदानंद कदम यांचा मुलगा अनिकेत कदम दापोली विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या समोर भाऊबंदकीचे आव्हान उभे ठाकणार आहे. अनिकेत कदम यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. संजय कदम यांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचा निर्धार अनिकेत कदम यांनी केल्याचे सांगितले जाते.