मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास संपला असून ही यात्रा आता लगतच्या मध्य प्रदेश राज्यात दाखल होणार आहे. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे पडसादही उमटत आहेत. मात्र, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी एक खळबळजनक विधान केल्यामुळे पुन्हा वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
राहुल यांची ही यात्रा स्टेज मॅनेज्ड असल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियावरील स्क्रिन शॉट शेअर केला आहे. यात कोणाचा फोन नंबर नाही मात्र हा मेसेज भारत जोडोच्या टीमकडून पाठवण्यात आला असल्याचे नितेश यांचे म्हणणे आहे.
So the Rahul Gandhi Yatra is stage managed..
This is a proof of how actors r bein paid to come and walk with him..
Sab Golmaal hai bhai !Ye Pappu kabhi pass nahi hoga!! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @amitmalviya pic.twitter.com/mq2TOrQFUp
— nitesh rane (@NiteshNRane) November 21, 2022
त्याचनुसार भारत जोडोत सहभागी होणाऱ्या कलाकारांना गेस्ट अपिअरन्ससाठी पैसे मोजून आणले जात असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
#AAPvBJP : केजरीवाल, सिसोदियांचीही मालिश व्हावी; भाजपचे कपिल मिश्रांनी Video पोस्ट करत केली टीप्पणी
राहुल यांच्यासोबत 15 मिनिटे चालण्यासाठी कलाकारांना पैसे दिले जात असल्याचे राणे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे मॅनेज केलेला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.