Rahul Gandhi: “कालच्या घटनेबद्दल मोदीजींनी माफीसुद्धा मागितलेली नाही” ; राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका
Rahul Gandhi: नीट पेपरफुटीवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

Rahul Gandhi: नीट पेपरफुटीवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. याविषयी बोलताना त्यांनी,”हा मुद्दा देशातील तरुणांच्या भविष्याशी संबंधित आहे आणि सरकार ते गांभीर्याने घेत नाहीये.” असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी पुढे म्हणाले, “अध्यक्ष म्हणाले की सरकारला जाब विचारावा लागेल. हा मुद्दा तरुणांच्या भविष्याशी संबंधित आहे. लोकांच्या हत्या होत आहेत. कालच्या घटनेबद्दल मोदीजींनी माफीसुद्धा मागितलेली नाही. हे तरुण शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धतीविरोधात आंदोलन करत आहेत. संपूर्ण देशाला माहीत आहे की ही व्यवस्था अयशस्वी झाली आहे आणि तिला वाळवी लागली आहे.” (Rahul Gandhi)
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “लाखो विद्यार्थी परीक्षा पद्धतीबद्दल चिंता व्यक्त करत असताना, सरकार स्पष्ट उत्तर देत नाहीये. ”
काँग्रेस नेत्याने आरोप केला की शैक्षणिक संस्थांमध्ये वैचारिक हस्तक्षेप वाढत आहे. ते म्हणाले, “प्रचारकांना कुलगुरू म्हणून नियुक्त केले जात आहे. आरएसएसने शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळवला आहे.” राहुल गांधी यांनी गृहमंत्री यांच्यावरही निशाणा साधला. “सध्याची परिस्थिती पाहता गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, “असे ते म्हणाले.
केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयावर प्रश्नचिन्ह Rahul Gandhi:
नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाला सातत्याने लक्ष्य करत आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. या मुद्द्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार चर्चा आणि गदारोळ होण्याची शक्यता आहे.
देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. याच संदर्भात, २० जुलै रोजी हजारो आंदोलकांनी जंतर मंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढला, जिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला, ज्यात शेकडो विद्यार्थी जखमी झाले.






