Rahul Gandhi on Modi: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी,” ते स्वतः विविध कारणांमुळे घाबरले आहेत.” असे म्हणत तयांचयावर टीका केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही टीका केली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी,” पंतप्रधान घाबरण्याची गरज नाही असे म्हणत आहेत, परंतु ते स्वतः पूर्णपणे वेगळ्या कारणांमुळे घाबरले आहेत. अदानी प्रकरण आणि एपस्टाईनमुळे ते घाबरले आहेत. ते सभागृहात प्रवेश करू शकत नाहीत.”असे म्हणत त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. केंद्र सरकार घाबरलेले -जयराम रमेश Rahul Gandhi on Modi: तत्पूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की, विरोधी पक्ष पश्चिम आशियातील परिस्थिती आणि त्याचा भारतावर होणाऱ्या परिणामांवर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत आहेत. Rahul Gandhi on Modi: परंतु मोदी सरकार अशा चर्चेला परवानगी देण्यास हट्टीपणे नकार देत आहे. सरकार स्पष्टपणे घाबरलेले दिसते. त्यांचे परराष्ट्र धोरण आधीच गंभीरपणे उघड झाले आहे. एलपीजी टंचाईवरून विरोधी पक्षांचे निषेध Rahul Gandhi on Modi: गुरुवारी, देशाच्या विविध भागांमध्ये एलपीजी टंचाईवरून काँग्रेस आणि इतर पक्षांनी पुन्हा एकदा संसद संकुलात निषेध केला. काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक आणि इतर अनेक विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या मकर गेटजवळ जमले आणि त्यांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यांनी “मोदी जी एलपीजी!” असे घोषणा दिल्या. विरोधी पक्षाच्या खासदारांनी गॅस सिलिंडरसारखे आकाराचे फलकही हातात घेतले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील या निषेधात सामील झाले.