Nana Patole | कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक वक्तव्य केले आहे. राहुल गांधी हे प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवरच चालत आहेत, असे पटोले म्हटले होते. त्यावरून वाद सुरू झाला आहे. नाना पटोले म्हणाले की, “राहुल गांधी हे प्रभू श्रीरामांचे कार्य पुढे नेत आहे. राहुल गांधी हे शोषित, पीडित आणि वंचित वर्गाला न्याय देण्याचं काम करत आहेत. पण आपण राहुल गांधी यांची तुलना प्रभू श्रीरामांशी केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पटोले यांच्या वक्तव्यावर स्वामी रामभद्राचार्य यांनी प्रतिक्रिया दिली.” पटोले हे काँग्रेस आणि गांधी घरण्याची चाटुगिरी करत आहे. राहुल गांधी हे कधीच प्रभू श्रीरामांना समजू शकत नाहीत. श्री राम आणि राहुल गांधी यांची कधीच तुलना होऊ शकत नाही. आता हे देवालाच ठाऊक की राहुल गांधी कसं काम करत आहेत,” असा चिमटा ही रामभद्राचार्य यांनी काढला. Nana Patole | राहुल गांधी जे कार्य करतायत, ते देशाच्या हिताचे स्वामी रामभद्राचार्य यांच्या या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. “रामभद्राचार्य हे मोठे आणि आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी करणार नाहीत, राहुल गांधी यांची लढाई ही नेहमी शेतकरी, गरीब आणि वंचित घटकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी सुरू आहे. काही लोक राहुल गांधी यांचे काम पाहू शकत नाही. कारण त्यांच्या म्हणण्यांनुसार, ते आंधळे आहेत. ते सत्य समजू शकत नाहीत. राहुल गांधी जे कार्य करत आहेत, ते देशाच्या हिताचे आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” नाना पटोले म्हणाले. पटोले यांनी रामायणाचे उदाहरण देत म्हटले की, जसे भगवान रामांना कठीण मार्ग आणि यातना सहन कराव्या लागल्या होत्या, तसेच आज राहुल गांधींनाही संघर्ष करावा लागत आहे. तसेच आपण श्रीराम आणि राहुल गांधी यांची तुलना कधीच केली नाही. पण राहुल गांधी हे श्रीरामांच्या मार्गावर चालत आहे,” असेही पटोले यांनी स्पष्ट केले. Nana Patole | श्रीराम आमचं दैवत – नार्वेकर तर श्रीराम आमचं दैवत असून पटोलेंनी ही भाषा करणं चुकीचं असल्याची टीका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. हेही वाचा: “महाराष्ट्रातील सगळे गुंड अजित पवार यांच्या…”; संजय राऊतांच्या विधानाने राजकारण तापलं