Radhakrishna Vikhe Patil । भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवलं. त्यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी टीम इंडियाचे कौतुक केले असून भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभेची जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विधानसभेची निवडणूक ताकदीने जिंकणार Radhakrishna Vikhe Patil । जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी, “भारताने विश्वकप जिंकला हा सगळ्या भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. भारतीय संघाचे आम्ही स्वागत करतो. त्यांचे अभिनंदन करतो. भारताने जसा विश्वकप जिंकला, तसेच आम्ही आगामी विधानसभेची निवडणूक त्याच ताकदीने जिंकणार असल्याचे त्यांनी म्हटले. करमणूक म्हणून आपण अशा बातम्याकडे पाहतो माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील हे अजित पवार यांना सोडून भाजपामध्ये जाणार असल्याचे वक्तव्य केले. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, या विषयात आपल्याला माहीत नाही, करमणूक म्हणून आपण अशा बातम्याकडे पाहतो, अशा बातम्या ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या असतात. अर्थसंकल्पाने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा Radhakrishna Vikhe Patil । इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात दुधाला भाव कमी असल्याचे म्हटले जात आहे. शेतकरी दुधाला भाव मागत आहे, असे विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कायमस्वरूपी पाच रुपये अनुदानाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल. काही बाबतीत दुधाचे संकलन करायला अडचणी येतात. दुधाच्या भुकटीची निर्यात थांबल्याने काही अडचणी आहेत. दूध भुकटीच्या निर्यातीला काही प्रोत्साहन देता येईल का? यावर विचार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी विमानतळावर अडवल्याने आ सुरेश भोळे यांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांना अखेर माफी मागण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. हेही वाचा “पंढरीच्या वारीत मी पायी चालणार ही बातमी खोटी” ; शरद पवारांचे स्पष्टीकरण